कडेकरांचा पाणी प्रश्न सुटला, तलावात ऐंशी टक्के पाणीसाठा

 पावसाची दमदार हजेरी; लिंबोडी तलावात पाणीच पाणी

--------------------

कडेकरांचा पाणी प्रश्न सुटला, तलावात ऐंशी टक्के पाणीसाठा



---------------------------------

कडा / वार्ताहर

---------------

परतीच्या पावसाच्या दमदार हजेरीमुळे कड्यासह अनेक गावांची तहान अवलंबून असणारा लिंबोडी तलावात जवळपास एकाच आठवड्यात ऐंशी टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या तलावाच्या संरक्षण भिंतीवरुन पाणी पडण्यासाठी अवघा दोन फुट इतकाच बाकी असल्याने नागरीकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 




आष्टी तालुक्यातील लिंबोडीचा तलाव हा कड्यासह परिसरातील जवळपास दहा ते बारा गावांची तहान भागवणारा एक मोठा प्रकल्प आहे. मागील दोन महिण्यापूर्वी या तलावात केवळ पंचवीस ते तीस टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मागील आठवड्यात परतीच्या दमदार पावसाने आष्टी तालुक्यात सर्वदूर हजेरी लावली. आठ दिवस तर अक्षरश: सुर्यदर्शन दुर्लभ झाले होते. सध्या तलावात जवळपास ऐंशी टक्के पाणीसाठा उपलब्ध झाल्याचे चित्र पाहायला मिळते. या लिंबोडी तलावाच्या संरक्षण भिंतीवरुन पाणी पडायला केवळ दोन फुट इतकाच बाकी राहिला. त्यामुळे कड्यासह परिसरातील अनेक गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागला म्हणावा लागेल. त्यामुळे नागरीकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

--------%%---------



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.