विद्यमान आमदारांनी फक्त कुटुंबाचा आणि नातेवाईकांचा विकास केला -माजीमंत्री सुरेश धस
आष्टी(प्रतिनिधी)-
माझे कुटुंब माझी जबाबदारी या धोरणानुसार.. मतदार संघातील जनता म्हणजे कुटुंब आणि विधानसभा सदस्य म्हणजे कुटुंबप्रमुख असे अपेक्षित असताना विद्यमान आमदारांनी "माझा मतदार संघ, म्हणजे आपले नातेवाईक असलेले पुतण्या,जावई आणि मेव्हणा यांनाच कामे देऊन आपला आणि आपल्या कुटुंबांचाच विकास केला आहे मध्यंतरीच्या कोरोना काळात आष्टी तालुक्यामध्ये सर्वात जास्त मृत्यूची संख्या ही विद्यमान आमदार यांच्या शिराळ गावाची होती संकट काळात जर हे आपले गाव संभाळू शकले नाहीत.आणि आता निवडणुका जवळ आल्यावर खोट्या विकास कामांच्या आपल्या मनानेच घोषणा करीत आहेत असा आरोप माजीमंत्री सुरेश धस यांनी केला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने डोंगरगण,कडा,सुरुडी गणातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या शुक्रवार दि.१६ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना माजीमंत्री सुरेश धस बोलत होते.
या बैठकीस कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रमजान तांबोळी,शेरी चे संदीप खाकाळ,कडा येथील सरपंच युवराज पाटील, भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष संजय आजबे यांच्यासह आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलतांना माजीमंत्री सुरेश धस म्हणाले की, माझे वडील हे मोठे गुत्तेदार होते मात्र मी १९९९ साली आमदार झाल्या नंतर आमच्या घरची गुत्तेदारी बंद झाली गुत्तेदारीचे रजिस्ट्रेशन सुध्दा रद्द झालं हे नम्रपणे सांगतो.परंतु सध्या आष्टी मतदार संघात काय चालले आहे ते बघा नुसते ब्लॉक बसविणे,सभागृह उभारणे त्यासाठी लागणारे साहित्य यांनी जिथे सांगायचं तिथूनच घ्यायचं त्यासाठी सिमेंट प्लांट यांचे,वाळू यांची,पत्रे यांचे आणि काम करताना गावातील कार्यकर्त्यांना जागा दाखवा म्हणून यांच्याच नातेवाईकांनी काम करायचे.त्यालाच विकासाचे गोंडस नाव देऊन माझे कुटुंब माझा माझा नातेवाईक आणि तेवढाच माझा मतदार संघ एवढेच काम या विद्यमान लोकप्रतिनधींकडून सध्या होत आहे.
सन २०१४ ला माझा पराभव झाला. त्यावेळेस भीमराव धोंडे निवडून आले.त्यांच्या पाच वर्षात त्यांनी ज्या योजनांचा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते नारळ फोडला ती सीना प्रकल्पातील पाणी मेहेकरी तलावात सोडणे ही योजना माझ्याच कार्यकाळात 97% पूर्ण केली होती असे सुरेश धस यांनी सांगितले.
यावेळी कडा गणातील उपसरपंच दिपक कर्डीले,माजी उपसरपंच बाळासाहेब कर्डीले,संपत सांगळे,अनिल ढोबळे, संजय ढोबळे,बाळासाहेब कर्डीले,संजय मेहेर,अजित घुले, मधुकर गिऱ्हे,सचिन घावटे,सुनील देशमुख,सय्यद अन्सार, राम मधूरकर,रतिलाल कटारिया,अशोक ढवन,काकासाहेब थेटे,संजय आजबे,कुमार जाचक,छगन कर्डीले,भाऊसाहेब भोजने,रमेश भोजणे,योगेश भंडारी,बिपीन भंडारी,जयंत खंदारे,गोविंद मिश्रा,अशोक राजपूत,गोरख कर्डीले,नागेश कर्डीले,संपत कर्डीले,दीपक कर्डीले,महेश कराळे,सतीश कर्डीले,बंडू सय्यद,राजाबपू कर्डीले,सागर खेडकर,दासा शिरोळे,संतोष भंडारी,राजू गावडे,विजय वेदपाठक,संतोष ओव्हाळ,सुभाष ढोबळे,राम धुमाळ,शैलेश गांधी,सुभाष घावटे,रमेश देशमुख,महेश घोलप,ऋषिकेश कर्डीले,परमेश्वर कर्डीले,महेश खाकाळ,अशोक पवळ डोंगरगण गणातील एम.डी.हरिभाऊ मार्कंडे,माजी.जि.प.सदस्य रामहरी महारनोर,भाऊसाहेब गोंदकर साहेब, गणप्रमुख बिट्टू पोपळे,राजेंद्र दहातोंडे,रमेश गावडे,सरपंच संदीप मार्कंडे, महादेव मोरे,गण प्रमुख रामेश्वर चव्हाण,चेअरमन अशोक मुळे, अँड.काकासाहेब देसाई,बाबासाहेब चांगण, माजी उपसभापती शिवाजी अनारसे,महादेव मोरे,सरपंच शिवाजी बुरुंगुले,माजी सरपंच सुनील जगताप,माजी सरपंच दत्ता चव्हाण, शरद काका देसाई,अन्सार शेख,चेअरमन भगवान पाचे,शाकिर शेख सुरुडी गणातील
एन टी. गर्जे ,रामभाऊ सारूक मामा,चेअरमन लक्ष्मण ननवरे,सुंदरलाल गर्जे,सरपंच विकास पवार,सरपंच रभाजी गर्जे, शेषराव गर्जे,बाळू गर्जे,माजी सरपंच अजिनाथ शेकडे,उपसरपंच बबन पुढारी तरटे,अश्रूबा गोल्हार, गणप्रमुख धनंजय तरटे,निवृत्ती दादा,नवनाथ आबा तरटे,उपसरपंच मच्छिंद्र वायभासे,राजेंद्र धस,त्रिंबक तोतरे,नवनाथ तोतरे,चेअरमन कारभारी गर्जे,बाबू भैय्या गर्जे,इंद्रजित गर्जे,वसंत मिसाळ, शंकर मिसाळ म्हतारदेव शेंडे,वैभव गोल्हार,बाळासाहेब वनवे,विठ्ठल गर्जे,रमेश खलाटे,शंकर मिसाळ,नितीन नाकाडे,अशोक दहिफळे, आनंद गावडे,लक्ष्मण गर्जे,मुरलीधर गर्जे,राहुल साबळे,अशोक दहिफळे,राहुल डोळे,लक्ष्मण खाडे, वासुदेव सानप, बद्रीनाथ गर्जे, बबन गावडे, मारुती डिसले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते,युवक,नागरिक मोठ्या उपस्थित होते.
stay connected