आष्टी तालुक्यातील बांधासह शेतातील मोठमोठ्या झाडांची खुलेआम कत्तल!
वनविभागाकडुन कारवाई होणार का?
दौलावडगाव प्रतिनिधी÷झाडे लावा झाडे जगवा या माध्यमांतून जनजागृती करत दरवर्षी शासनस्तरावरून कोट्यावधी रूपये खर्च करून नवीन झाडे लावले जातात. पण हे नवीन झाडे लावताना दुसरीकडे बांधासह,शेतातील जुन्या मोठमोठ्या झाडांची विनापरवाना तोड करून खुलेआम वाहतूक होत असताना वनविभाग कसलीच कारवाई करत नसल्याने एका प्रकारे कत्तल करणारांना पाठराखण करत असल्याचे समोर आले आहे.
आष्टी तालुक्यातील शेतातील पिके निघल्याने बांधावरील व शेत परिसरातील मोठमोठी झाडे वनविभागाची कसलीच परवानगी न घेता टेम्पो,टॅक्टर मध्ये मशिन घेऊन अनेक वर्ष जगवलेले झाड तासांत भुईसपाट करून व्यापारी विक्रीसाठी साठा करून ठेवत आहेत. पर्यावरणाचे कसलेच देणेघेणे नसल्याने आर्थिक माया कमवण्यासाठी बेसुमार वृक्षतोड केली जात आहे.या वृक्षतोडीकडे वनविभागाचे दुर्लक्ष आहे.राजरोस पणे वृक्षतोड सुरू असताना यंत्रणा का बिनघोर आहे.असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.विनापरवा वृक्षतोड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
तर होऊ शकतो गुन्हा दाखल
अवैध वृक्षतोड, वृक्षछाटणी करून पर्यावरणाला हानी पोहचविणे हा गुन्हा असून याबाबत अदखलपात्र गुन्हा (N.C.) नोंदविला जात होता. मात्र याबाबत महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध अधिनियम, 1995 मधील कलम 2 (ग) व 3 अन्वये गुन्हा नोंदविला जाऊ शकतो.
प्रभारीवर भार काहीच कामाचा नाही!
सध्या वनविभागाचा कारभार प्रभारीवर आहे.प्रभारी कसलीच जबाबदारी घेत नसल्याने ठोस कारवाई होताना दिसत नाही.तालुक्यातील वृक्षतोडीला लगाम बसवला जावा.यासाठी प्रभारी काय उपाय योजना करणार.
stay connected