बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा व शिरूर तालुक्यात वादळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.नरसिंह लक्ष्मणराव जाधव यांची मागणी.
दि. 11 जून 2025 रोजी बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा व शिरूर या तीन तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमाल, कांदा, फळबागा, जनावरे, गोठे आणि राहत्या घरांचा प्रचंड नाश झाला आहे. या घटनेमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाले असल्याने सर्वांनाच फटका बसला आहे.सद्य परिस्थितीत, शेतकऱ्यांना मानसिक आणि आर्थिक धक्का बसलेला आहे. ते अनेक संकटांचा सामना करत आहेत आणि त्यांना त्वरित मदतीची आवश्यकता आहे. पिकांच्या नुकसानीसोबतच, गोठ्यांची आणि घरांची हानी शेतकऱ्यांच्या कुटुंबावर मोठा परिणाम करत आहे. या आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे आयुष्य अत्यंत कठीण झाले आहे.या नुकसानाचे पंचनामे त्वरित पूर्ण केले जावेत आणि शेतकऱ्यांना त्यानुसार भरपाई देण्यात यावी. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे आणि न्यायाचे मिळावे यासाठी तात्काळ कार्यवाही होणे आवश्यक आहे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.नरसिंह लक्ष्मणराव जाधव यांनी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे केली. त्यामध्ये सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी त्वरित निर्णय घेईल. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि ते पुन्हा आपल्या शेतावर काम करू शकतील. अशी अपेक्षा व्यक्त करून सरकारने तात्काळ लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करून आवश्यक ती भरपाई दिली जावी अशी विनंती केली.
stay connected