कडा रेल्वे मार्गावरील हेलपाटा कधी कमी होणार ?
निधी मिळूनही दीड वर्षांपासून उड्डाणपूल प्रतिक्षेत..
आष्टी:
कडा येथील रेल्वे उड्डाणपूल बांधकामास मंजुरी मिळाल्यानंतर.. पन्नास कोटी रुपये निधीही उपलब्ध होऊन दीड वर्ष झाले तरी सार्वजनिक बांधकाम विभागास अद्याप या पुलाचे काम सुरू करण्यास मुहूर्त सापडत नसल्याने या ही वर्षीही या मार्गाने जाणाऱ्या वारकऱ्यांना दीड किलोमीटरचा हेलपाटा मारावाच लागणार आहे... परिसरातील नागरिक या उड्डाणपुलाच्या प्रतीक्षेत आहेत.. विशेष म्हणजे या ठिकाणी चार ठिकाणी 90 अंशाच्या कोणात वळणे असल्यामुळे सतत अपघात होत आहेत तरीही या उड्डाणपुलाच्या बांधकामाकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे
बीड परळी रेल्वेमार्गावरील वळण रस्त्यामुळे अनेक अपघात झाले असून त्यात काहींना जीव गमवावा लागला तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल मंजूर करावा ही नागरिकांची मागणी मंजूर होऊन यासाठी ५० कोटी रु. निधी मागील अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आला होता..हा निधी मंजूर होऊन ..निविदा मंजूर होऊन कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे असे समजते.
पाथर्डी, शेवगाव सह अहिल्यानगरच्या उत्तर भागातून येणाऱ्या वारकरी दिंड्यांना पंढरपूर कडे जाण्यासाठी कडा येथून याच मार्गावरून जावे लागते आहे यंदाच्या वर्षी वारकऱ्यांना या उड्डाणपुलाचा लाभ होणार नाही.. किमान पुढच्या वर्षी पर्यंत तरी हा उड्डाणपूल तयार व्हावा अशी समस्त वारकऱ्यांसह नागरिकांची मागणी आहे..
stay connected