आदिनाथ महाराज आंधळे यांनी दिले " दिव्य कुराण " सप्रेम भेट;
एकता जपण्याचा दिला संदेश..
आष्टी : माणिकदौंडी ता.पाथर्डी येथील गडाचे मठाधिपती हरिभक्त परायण आदिनाथ महाराज आंधळे यांनी एका अनौपचारिक कार्यक्रमांमध्ये आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांना मराठी भाषेतील दिव्य कुराण शरीफ हा ग्रंथ सप्रेम भेट देऊन सामाजिक एकता, समता आणि बंधुभाव जपण्याचा संदेश दिला आहे
ह.भ.प. आदिनाथ आंधळे महाराजांनी स्वतः केवळ सात दिवसांत संपूर्ण कुराणाचे वाचन केले असून
महाराजांनी आपल्या भाषणात सांगितले की, "कुराणमधील विचार अतिशय सुंदर असून, त्यामध्ये मानवाने कसे जगावे, दुसऱ्यांशी कसे वागावे, समाजात शांततेने व सन्मानाने कसे राहावे याचे स्पष्ट मार्गदर्शन आहे." त्यांनी पुढे सांगितले की, "श्रीमंत असो वा गरीब, शेवटी सगळ्यांनाच एकाच जागी जायचं आहे. म्हणून सर्वांनी जात-पात, धर्म बाजूला ठेवून प्रेमाने, शांततेने आणि ऐक्याने राहावे."
या प्रेरणादायी उपक्रमाबद्दल मुस्लिम समाजातर्फे ह. भ. प. आंधळे महाराज यांचा विठ्ठल-रुक्मिणी ची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी सय्यद शहाबुद्दीन यांनी मनःपूर्वक आभार मानले.
या कार्यक्रमाला धामणगाव येथील युवा कार्यकर्ते विजय गाढवे, माजी पंचायत समिती सदस्य रावसाहेब लोखंडे, राजू चौधरी, पप्पू लोखंडे, शाहबुद्दीन सय्यद, डॉ. अकील सय्यद, इस्लाम सय्यद, अलीम शेख, साजिद पटेल, बाबर शेख, मौलाना अफसर, मौलाना इस्लाम, जमात अमीर साहेब, तबरेज सय्यद, फारुख शेख, राजू शेख उपस्थित होते
stay connected