आष्टीत माजी विद्यार्थ्यांची २८ वर्षांनी पुन्हा भरली एकदिवसाची शाळा... १९९७ दहावी बॅच मधील विद्यार्थी विद्यार्थिनीनी दिला जून्या आठवणींना उजाळा गुरूवर्य शिक्षकांना सन्मानपत्र देऊन केला गौरव.

 आष्टीत माजी विद्यार्थ्यांची २८ वर्षांनी पुन्हा भरली एकदिवसाची शाळा...
१९९७ दहावी बॅच मधील विद्यार्थी विद्यार्थिनीनी दिला जून्या आठवणींना उजाळा
गुरूवर्य शिक्षकांना सन्मानपत्र देऊन केला गौरव.



आष्टी। प्रतिनिधी 

तब्लल २८ वर्षांपूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी यांची पुन्हा एकदा आष्टीत शाळा भरली. बेचाळीशी ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी त्याकाळी शाळेतील बाकांवरच्या मित्र-मैत्रिणी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते आष्टी शहरातील जिल्हा परिषद मुलांची शाळा आष्टी,श्री गणेश विद्यालय आष्टी,पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय आष्टी, जिल्हा परिषद कन्या प्रशाला आष्टी या चार शाळेतील इयत्ता दहावीच्या १९९७ वर्षातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे गेट-टुगेदर स्नेहसंमेलन शनिवार दि.७ जून रोजी आष्टी येथील मोरेश्वर लाॅन्स येथे पार पडले.यावेळी तब्बल चार शाळेतील २० गुरूवर्य शिक्षकांना साल,सन्मानपत्र,गुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

या गेट-टुगेदर स्नेहसंमेलनात तब्बल १२० विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.तर २० शिक्षक व शिक्षीका यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाच्या अगोदर काही शिक्षकांचे निधन झाले अशांना व बॅचमधील ज्या मित्रांचे दुर्दैवाने निधन झालेली आहेत अशा सर्व मित्र-मैत्रिणींना व युद्धातील शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात केली.

तब्बल २८ वर्षानंतर सर्व विद्यार्थ्यांना एकमेकांना पाहून खुप आनंद वाटला. सर्व विद्यार्थी आपापल्या विविध क्षेत्रात काम करत असून आजच्या कार्यक्रमासाठी वेळ काढून हे सगळे विसरून फक्त सर्व विद्यार्थी म्हणूनच एकत्र आले होते. या गेट-टुगेदर साठी जवळजवळ पंधरा ते वीस दिवसांपासून सर्व स्थानिक विद्यार्थी यांचे नियोजन चालू होते. आज त्या नियोजनाला मूर्तीमंत रूप आले. तब्बल एक वर्षांपूर्वी सर्व दहावीच्या १९९७ च्या बॅचने एकत्र येण्याची संकल्पना आष्टी येथील चार हि शाळेतील मित्रांनी बोलून दाखवली होती. व त्यासाठी सर्वच जण सतत कार्यरत असलेले स्थानिक मित्र-मैत्रिणी यांना कार्यक्रमाची रूपरेषा ठरवून कार्यक्रमाचे आयोजन कसे चांगले करता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. जवळजवळ महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विद्यार्थी राहत असल्यामुळे सर्वांचे नंबर कलेक्ट करणे त्यांना वेळोवेळी कॉन्टॅक्ट करून कार्यक्रमाविषयी आस्था निर्माण व्हावी यासाठी वेळोवेळी संपर्क साधून "१९९७ बॅच" हा व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला व त्या ग्रुपवर नंतर सगळ्या मित्रांना ऍड करून ग्रुप चालू झाला व त्यावर गेट-टुगेदर च्या कार्यक्रमाची सूचना व फायनल तारीख सर्वांच्या मते ठरवण्यात आली. तो आनंदाचा दिवस उजाडला कार्यक्रमाचे ठिकाणी विद्यार्थी पोहोचल्यावर प्रथम त्यांच्याकडून स्वतः सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणची माहिती रजिस्टरमध्ये नोंद करण्यात आली.त्यानंतर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना फेटा बांधून वाजत गाजत शाळेसारख्या लाईनीमध्ये लाॅन्समध्ये प्रवेश करून कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यात सर्वांचा परिचय करून घेण्यात आला.त्यानंतर काही शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.



सकाळी नाश्त्याचा कार्यक्रम झाल्यानंतर व दुपारी भोजनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर दुपारच्या सत्रातही. या सगळ्या गोष्टींमध्ये सर्व विद्यार्थी आपलेआजचे वय सध्या जगण्याची सगळे टेन्शन विसरून खरंच परत एकदा त्या काळातील विद्यार्थीच झाले होते.त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंद दिसत होता. सगळे एकमेकांना जुन्या गोष्टीची आठवण करून देऊन जुने किस्से सांगत होते.यानंतर सर्वच विद्यार्थ्यांनी डिजेच्या विविध गाण्यांवर मनसोक्त नाचण्याचा आनंद लुटला. आणि सर्व विसरूनच गेले होते जणू २८ वर्षात राहिलेल्या सर्व गोष्टी जणू सर्व विद्यार्थी आजच्या कार्यक्रमात भरूनच काढत होते.हा गेट-टुगेदरचा कार्यक्रम सुरळीत व्हावा यासाठी स्थानिक विद्यार्थी राजीव नरवडे,अविनाश कदम,शरद रेडेकर,राजु गोल्हार, राहुल भोसले, प्रितम कासवा, संतोष कदम,शरद गायकवाड,डॉ रामदास सानप,राजु कारंडे,राहुल निकाळजे,शहादेव धनवडे,महेश टेकाडे,रोहिदास पवार,अमृत वाढरे, नितिन सायकर, डॉ प्रियंका हंबर्डे,अश्विनी निबोरे,मनिषा शिंदे,अनुप्रिता मेहेर,अर्चना पांडव,अंबिका जगताप,रूपाली मेहेर, प्रियंका मेहेर,चंदा धनवडे,हारूबाई सुळे यासह सर्व विद्यार्थी  मित्रांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षक संपत गायकवाड हे होते.यावेळी शिक्षक प्रल्हाद काळे,महादू शिंदे, लहु करपे,वामण निकाळजे, शिक्षिका विजया संत्रे,

मुक्ता बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले शेवटी अध्यक्ष भाषण संपत गायकवाड यांचे झाले.

तर विद्यार्थी मधून डॉ मुकुंद विधाते, प्रकाश हंबर्डे, डॉ फेरोज तांबोळी,प्रितम कासवा,शरद रेडेकर,अतुल मुळे व विद्यार्थीनींनी मधून डॉ प्रियंका हंबर्डे, मनिषा शिंदे,अनुप्रिता मेहेर यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल निकाळजे यांनी केले तर बहारदार सूत्रसंचालन शिवानी शिंगवी यांनी तर आभार अविनाश कदम यांनी मानले.व या धावपळीच्या जगात वर्षातून एकदा तरी सर्व मित्रांनी एकत्र येण्याचे ठरवून कार्यक्रम घेण्याचे ठरवले आहे. हा कार्यक्रम अतिशय खेळीमेळीच्या व आनंदात यशस्वीरित्या पार पडला.व शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

 



२० शिक्षकांना सन्मानपत्र देऊन केला गौरव


शिक्षक संपत गायकवाड, पोपटराव भोसले,अशोक काकडे, रामराव चव्हाण, प्रल्हाद काळे, महादू शिंदे, चांगदेव सातव, लहु करपे,वामन निकाळजे, रमेशसिंह देसुरकर, जी.एम भागवत, भाऊसाहेब जगताप, सुनील काकडे, दादासाहेब खाडे, मधुकर सोळसे,संभाजी नवसुपे, शिक्षिका विजया संत्रे, मंगलप्रभा गर्जे,निर्मला सोले, मुक्ता बनसोडे या २० शिक्षक गुरूवर्य यांना साल, गुच्छ, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.