घरकुल धारकांनी कुणालाही रूपया देऊ नये,घराचे लवकर काम करून दिवाळी नव्या घरात साजरी करावी-
गटविकास अधिकारी बागलाने
--------------------------------------
आष्टी (प्रतिनिधी)-
तालुक्यात जवळपास नवीन घरांसाठी वीस हजार पेक्षा अधिक मागणी अर्ज बेघर धारकांनी केले आहेत.आता नविन मंजूर झालेल्या घरकुल धारकांनी कुणालाही एक रूपाया देऊ नये,जर कुणी मागणी केली तर त्याची तक्रार आमच्याकडे रितसर करावी आणि यंदाची दिवाळी नव्या घरात साजरी करावी असे आवाहन आष्टी पंचायत समिती चे गटविकास अधिकारी जी.व्ही.बागलाने यांनी केले आहे.
आष्टी पंचायत समिती कार्यालयातील गटविकास अधिकारी यांच्या कक्षेत शुक्रवार (दि.१३)रोजी दुपारी ४.३० वा.पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.पुढे बोलतांना ते म्हणाले,पक्के आणि प्रशस्त घर असावे हे प्रत्येकाचं स्वप्न असत.केंद्र व राज्य सरकारच्या संकल्पनेतून व आमदार सुरेश धस यांच्या प्रयत्नाने आष्टी तालुक्यात जवळपास २० हजारांपेक्षा जास्त गरजूंनी अर्ज दाखल केले आहेत.आता ह्या घरांची स्वप्न येत्या दिवाळीत पुर्ण होऊन यंदाची दिवाळीच नव्या घरात घरकुल धारकांनी साजरी करावी.परंतु ही नव्या घरात दिवाळी साजरी करण्यासाठी कुणाला रूपाया देण्याची गरज नाही असे आवाहन गटविकास अधिकारी बागलाने यांनी सांगितले.
stay connected