*देशप्रेमाच्या संदेशांनी भारावलेला डॉ.आर्शिया व मुस्तफा यांचा विवाहसोहळा*
दिघंचीतील मुन्नाभाई तांबोळी यांच्या देशभक्तीसह ऐक्याचे अनोखे उदाहरण.
दिघंची येथील हिरा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष,दिघंची ग्रामपंचायतीचे उपसरपंच गरजूंना मदतीचा हात देणारे म्हणून ज्यांची ओळख आहे असे सामाजिक कार्यकर्ते जहांगीर उर्फ मुन्नाभाई तांबोळी यांची वैद्यकीय शिक्षण घेतलेली कन्या डॉ.आर्शिया व पंढरपूर येथील मुस्तफा यांचा विवाह दिघंची (या.आटपाडी, जिल्हा सांगली)येथे संपन्न झाला.
या देखण्या विवाह सोहळ्यात देशप्रेम, सामाजिक ऋॖणानुबंध , भारत माता की जय,जय जवान जय किसान,अशा घोषणांनी देशभक्तीचा संदेश पहायला मिळाला.ओतपोत भरलेल्या देशाविषयी असलेले ऋॖणानुबंधांनी अंगावर रोमांच उभे राहिले.
पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात निरपराध भारतीय मारले गेले, याला प्रतीउत्तर म्हणून भारतीय लष्करांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांचे उध्वस्त केलेले दहशतवादी अड्डे,नापाक पाकचे उधळलेले मनसुबे याचा निषेध करून दिघंची येथील सामाजिक कार्यकर्ते जहांगीर उर्फ मुन्नाभाई तांबोळी यांची कन्या डॉ आर्शिया व मुस्तफा यांच्या विवाह सोहळा देशप्रेमाच्या वातावरणांनी भारावून गेलेला होता.
यावेळी दहशतवाद्यांबरोबर लढताना शहीद झालेले निरपराध नागरिक, भारतीय लष्करातील अधिकारी, जवान यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या विवाह सोहळ्यासाठी खासदार विशाल पाटील, आमदार सुहास बाबर, जिल्हा बॅंकेचे संचालक तानाजी पाटील, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख,सह राजकीय, सामाजिक उद्योग,कॄषी क्षेत्र, मित्र परिवार, नातेवाईक, विवाह सोहळ्यासाठी उपस्थित होते
या अनोख्या, देखण्या विवाह सोहळ्यात शत्रूंशी लढणाऱ्या भारतीय जवानांचे मनोबल उंचावणारे क्षण पहायला मिळाले
या विवाह सोहळ्यासाठी जवळजवळ नऊ -दहा हजार बांधव उपस्थित होते,अशा अनोखा विवाह सोहळा पार पडला.
या विवाह सोहळ्यासाठी उपस्थितांठी विवाह सोहळ्याचे प्रमुख जहांगीर उर्फ मुन्नाभाई तांबोळी यांचे नातेवाईक व मित्र परिवारांनी जेवणाची खास सोय केलेली होती.
stay connected