मजुरीच्या नावाखाली गोर गरीब मजुरांचे कोणी हाल करतं असेल तर नक्की कळवा-डॉ.जितीन वंजारे

 *मजुरीच्या नावाखाली गोर गरीब मजुरांचे कोणी हाल करतं असेल तर नक्की कळवा-डॉ.जितीन वंजारे* 



*जिल्ह्यात रोजगार हमी योजना प्रभावीपणे  राबविली पाहिजे,यंत्राने काम केल्यास तत्काळ कळवा- डॉ.जितीन वंजारे*


         काही दिवसांपूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये भूम येथे अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली इतर राज्यातून काही मजूर विहीर खोदण्यासाठी आणले गेलेले असताना त्या मजुरांकडून रात्रंदिवस काम करून घेताना येथील दलाल लोक दिसले त्यामध्ये त्यांना सर्रासपणे विषारी दारू, गांजा आणि तस्तम अमली पदार्थ व नशेरी पदार्थ चारून किंवा पिऊ घालून त्यांच्याकडून दिनरात काम करून घेतले जात असे,त्यांच्याकडून आठरा ते वीस तास काम करून घेतले जात असे,त्यांना उपाशी ठेवणे ,भरपूर दारू पाजने,आरोग्य तपासणी न करता आजारी कामाला लावणे ,वेळेपेक्षा जास्त काम करून घेणे ,सुट्टी न देणे,रात्री पळून जाऊ नये म्हणून साखळदंडाने बांधून टाकने,पुरती मजुरी न देणे,आराम करू न देणे,अश्या अनेक गोष्टी ते दलाल लोक करून घेत असत हे होत असताना  यातील एका बंदिस्त व्यक्तीने कसाबसा पळ काढून पोलीस स्टेशन गाठले आणि त्यानंतर त्या प्रकरणाचा सुगावा लागला होता. ही घटना मानवतेला काळीमा भासणारी असून अशा घटना माणसा-माणसात जर होत असेल तर हा कायदा,हे शासन, प्रशासन, हे सरकार कुचकाई आहे याला एक माणूस म्हणून तुम्ही आम्ही लोक चळवळ हातात घेऊन काम केलं पाहिजे आणि गोर गरीब मजुरांसाठी आवाज उठवला गेला पाहजे यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कामगार नेते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी अशा घटनांना आवर घालण्यासाठी वेळीच प्रशासनाला जागं करून न भिता, न घाबरता,अशा होणाऱ्या अत्याचार अन्यायाला बळी न पडता प्रकरण अवघडकिस आणून कायद्यांवये गुन्हे दाखल करून घेण्याची सांगितले आहे.यामध्ये अश्या घटना कोठे होत असतील तर कृपया जवळील पोलिसांना कींवा सामाजिक कार्यकर्त्या ना कळवा नसता डॉ जितीन वंजारे यांना 9358420909या मोबाईल नंबर वर  संपर्क करा असे आवाहन स्वतः सामाजिक कार्यकर्ते तथा कामगार नेते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरी यांनी केले आहे.

        काही दलाल लोक इतर राज्यातून गोरगरीब मजूर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पुरवत आहेत ते कोणत्यातरी मुकादमाला किंवा कॉन्ट्रॅक्टरला मजूर पुरवून त्यांच्यावर दलाली खात आहेत अशी वेठबिगारी चालू आहे, असे विकत घेऊन आणलेले मजूर एखाद्या गुलामाप्रमाणे वापरून त्यांच्याकडून भरपूर प्रमाणात कष्टाची कामे करून घेतली जात आहेत ही अत्यंत अमानवीय गोष्ट असून मानवी मनाला दुःख होण्यासारखी गोष्ट आहे यावरती शासन प्रशासनातील लोकांनी, ह्युमन राईट्स वाल्यांनी  डोळे उघडे करून पाहिलं पाहिजे.अशा अत्याचार अन्याय करणाऱ्या लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्या पाहिजेत.आज महाराष्ट्रामध्ये भट्टी कामगार, बेकरी कामगार,ऊसतोड कामगार, शेती कामगार, खोदकाम कामगार, बिगारी कामगार, हमाली कामगार, मिल कामगार,कोळसा खाणी कामगार,सुत गिरणी कामगार, सिमेंट कामगार इत्यादी कामासाठी बाहेरच्या जिल्ह्यातून किंवा बाहेरच्या राज्यातून लोक बोलावले जातात त्यांना अति अल्प मजुरी देऊन त्यांच्याकडून 18 ते 20 तास काम करून घेतले जाते,वरतून त्यांना जेवणातून विष देऊन,पिण्यासाठी अमली पदार्थ नशेरी दारू देऊन त्यांचा आवाज दाबला जातो त्यांना इतर लोकांच्या संपर्कात येऊ दिले जात नाही त्यांना दुसऱ्यांना बोलण्यास सक्त मनाई आहे, अशा गोरगरीब मजुरांकडून जास्तीचे कष्ट घेऊन स्वतःच्या आर्थिक लाभासाठी दुसऱ्याची घर घालणारी अनैतिक मानसिकतेची लोक ठेचून काढले पाहिजेत. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत होणाऱ्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपव्यय होऊन ती कामे सर्रासपणे यंत्राने केली जातात महाराष्ट्रामध्ये आणि संबंध भारतामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत गोरगरिबांच्या हाताला काम मिळवून देणे ग्रामीण भागामध्ये तत्सम दुर्गम भागामध्ये गोरगरिबांच्या हाताला काम मिळावं म्हणून महाराष्ट्र शासन तसेच भारत सरकार कार्यतत्व असून गावातील रोजगार सेवक सर्व शेतकऱ्यांचे मजुरांचे जॉब कार्ड गोळा करतो आणि तो कॉन्ट्रॅक्टरच्या हवाली करून त्यामध्ये दलाली खाऊन रोजगार हमी योजनेअंतर्गत होणारे काम रातोरात यंत्राने केले जातात आणि या कामांमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार केला जातो हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे.मी एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने आपणास सर्व जॉब कार्ड धारकांना सांगू इच्छितो की हा भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासनाचा आलेला पैसा हा तुमच्या मालकीचा आहे त्यामुळे तुम्ही तुमचे जॉब कार्ड रोजगार सेवकाला न देता तीस दिवसाच्या आत मध्ये तुम्हास काम न भेटल्यास त्या बदल्यात त्याचा पगार मागण्याचा अधिकार तुम्हाला आहे त्यामुळे जॉब कार्ड अहस्तांतरित असताना कोणाच्याही हातात देता कामा नये. मी गावागावातील उच्च सुशिक्षित तरुणांना विनंती करतो की गावातील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून होणारी काम ही मजुराच्या साहाय्याने झाली पाहिजे या कामामध्ये यंत्राचा वापर केल्यास त्याचे फोटो व्हिडिओ कामाचा तपशील इत्यादी सर्व प्रशासनाला दाखवून संबंधित कॉन्ट्रॅक्टर वर कायदेशीर कार्यवाही केली गेली पाहिजे या कामांमध्ये जर कोणास अडथळा निर्माण होत असेल तर संबंधित क्षेत्रातील पोलीस स्टेशन मध्ये अर्ज करून तुम्हावर झालेला अत्याचार अन्याय दूर करू शकता किंवा यामध्ये कोणी त्रास देत असेल तर सामाजिक कार्यकर्ता या नात्याने मला वरील नंबर वर नक्की फोन करू शकता परंतु कष्टकरी कामगारांच्या हक्काचा पैसा त्यांनाच मिळाला पाहिजे अशी ठोस भूमिका सामाजिक कार्यकर्ते तथा कामगार नेते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरकर यांनी घेतली आहे.बीड जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायती अंतर्गत होणाऱ्या रोजगार हमी योजनेअंतर्गत च्या कामांमध्ये गावातील नव lतरुणांनी लक्ष देऊन यंत्राने काम न करता ते काम मजुरांच्याच हाताने झाले पाहिजे त्यांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे असा अट्टाहास धरून संबंधित कॉन्ट्रॅक्टर वर काळया यादीची कार्यवाही होईल याची खबरदारी घेतली पाहिजे.त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीत होणाऱ्या मनरेगा अंतर्गत कामाचा दर्जा आणि रोजगार कार्ड धारकांना डावलून यंत्राने होणारे काम बंद पाडा ,येणार पैसा रोजगार कष्टकरी जॉब कार्ड धारक यांना मिळालाच पाहिजे याची खबरदारी घ्या असे आवाहन कामगार नेते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केले आहे.














टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.