स्वार्थापोटी भूमिका बदलणाऱ्या नेत्यांना जनता त्यांची जागा दाखवून देणार - आ. संदीप क्षीरसागर
बीड/प्रतिनिधी
विश्वास राऊत
बीड जिल्ह्यातील अनेक नेते हे शरदचंद्र पवार साहेबांच्या जीवावर मोठे झाले.स्वार्थापोटी त्यांना धोका देऊन गेले.मात्र अशा भूमिका बदलून स्वार्थापोटी जनतेला सोडून देणाऱ्या नेत्यांना बीड जिल्ह्यातील जनता त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड येथे ईदनिमित्त मुस्लिम बांधवांच्या घरी गाठी भेटी घेत असताना व्यक्त केला.
बीड लोकसभेचे राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवारबजरंग सोनवणे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर यांनी रमजान ईद या पवित्र सणानिमित्त बीड शहरातील मुस्लिम बांधवांना भेटून शुभेच्छा दिल्या.त्यांच्या निवासस्थानी जाऊन फराळाचा आस्वाद घेतला.यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना आ.संदीप क्षिरसागर म्हणाले की, बीड जिल्हा हा शरद पवार साहेब यांच्या विचारांवर व त्यांच्यावर प्रेम करणारा जिल्हा आहे.जिल्ह्यातील अनेक नेते त्यांच्या जीवावर मोठे झाले,परंतु स्वार्थापोटी पक्ष बदलून भाजपात गेले.असे उत्तर त्यांनी भाजपात गेलेल्या आमदारांबद्दल विचारलेल्या प्रश्नाला दिले. मात्र या जिल्ह्यातील मतदार सुज्ञ व हुशार आहेत.त्यांच्या स्वार्थी व धोका देण्याच्या प्रवृत्तीवर मतदार व जिल्ह्यातील जनतेची नाराजी आहे. त्यांच्या बदललेल्या भूमिकेला जनता कधीही पाठिंबा देणार नसून भूमिका बदलणाऱ्यांना त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही. असे स्पष्ट मत संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केले.
stay connected