निवडणूक ही भावनिक नव्हे,तर विकासाच्या मुद्द्यावर लढायला हवी - बजरंग सोनवणे,बीड येथे मुस्लिम बांधवांच्या भेटी रमजान ईदच्या दिल्या शुभेच्छा.

 निवडणूक ही भावनिक नव्हे,तर विकासाच्या मुद्द्यावर लढायला हवी - बजरंग सोनवणे,बीड येथे मुस्लिम बांधवांच्या भेटी रमजान ईदच्या दिल्या शुभेच्छा.



बीड/प्रतिनिधी 

विश्वास राऊत 

भाजपच्या मागील पंधरा  वर्षाच्या काळात बीड जिल्ह्याचा  विकास झालेला नसून त्यांना भावनिक आधार घ्यावा लागतो.हे दुर्दैव असल्याची टीका महा विकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी करीत ही निवडणूक भावनिक नव्हे,तर विकासाच्या मुद्द्यावर लढायला हवी असे मत व्यक्त केले. 

बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आ.संदीप क्षिरसागर यांनी रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांच्या भेटी घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.त्यानंतर बजरंग सोनवणे हे माध्यमांशी बोलत होते. 





पुढे बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले की,बीड लोकसभेची निवडणूक ही जातीपातीच्या नव्हे तर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवीत असून आम्ही निवडणूक जिंकणारच.असा आत्म विश्वास व्यक्त करीत मराठा आणि ओबीसी यांचाही राज्यघटनेनुसार आरक्षणाचा अधिकार असल्याचा मुद्दा ही त्यांनी उपस्थित केला.त्यांनी शेतकरी पुत्र असल्याचा रास्त अभिमान असून मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे म्हणून मी शेतकरी पुत्र आहे.यात काही शंका नाही.तर भाजप हे आमच्यासाठी आव्हानच नसल्याचे सांगितले.


मला एक घर आहे,दुसऱ्या घराची गरज नाही


भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे या बीडमध्ये घर घेणार असल्याच्या मुद्द्यावर माध्यमांनी त्यांना विचारले असता तेम्हणाले की,जिल्ह्यामध्ये माझे एक घर असून राष्ट्रवादी भवन हे देखील पक्षाचे व अर्थात माझेच घर आहे.त्यामुळे मला एक घर असताना दुसरे घर करण्याची आवश्यकता नाही.असे मिष्कील उत्तर त्यांनी यावेळी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.