सरकारी यंत्रनांचा गैरवापर करुन केजरीवालांना जेल मधे पाठवन्यापेक्षा मोदींनी निवडनुकीला सामोरे जायला पाहीजे होत-प्रदिप थोरवे
कालचा दिवस आम आदमी पार्टी साठीच नव्हे तर संम्पुर्ण देशासाठी काळा दिवस असेल, कारन या जुलमी सरकारने या देशाच्या हुकुम शहाने आपचे सर्वेसर्वा आणी दिल्लीचे मुख्यमंत्री मा अरवींद केजरीवाल यांना बेकायदेशीर अटक केली. निवडणुकांमध्ये भाजपा पार्टी केजरीवाल यांना हरवू शकली नाही. त्यामुळे आता सुडाचे राजकारण म्हणून सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. आज ही परिस्थिती असेल तर चुकून २०२४ ला भाजप सत्तेत आली तर संविधान आणि लोकशाही हे सर्वांना विसरावं लागेल. या कारवाईवरुन मात्र एक स्पष्ट झालं की, भाजप घाबरलीय..!
केजरीवाल हे व्यक्ती नसुन शिक्षण,आरोग्य आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन अशा क्रांतिचा एक विचार आहेत .या विचाराला भाजपा कधीच थांबवू शकत नाही.
भाजपा मधे हिमंत असेल तर मोदींनी केजरीवालांविरोधात निवडनुक लढवायला पाहीजे होती. "मै तो फकीर आदमी हुं झोला लेके चल पडुंगा म्हननारे मोदिजी, त्या झोळी मधे कीती कोटी घेवुन जात आहेत याचा आकडा ईलेक्ट्रॅाल बॅांड च्या माध्यमातुन समोर आलाय, या देशातील व्यवसायीकांना ईडी सीबीय चा धाक दाखवुन त्यांच्याकडुन करोडो रुपये वसुल केले आहेत,विरोधी पक्षातील मोठ्या नेत्यांच्या घरी धाडी टाकुन त्यांना ब्लॅकमेल करुन भाजपा मधे घेतले गेलं. भ्रष्टाचारी लोकांच्या गळ्यात मंत्रीपदाच्या माळा, आणी जे ईमानदारीने समाजसेवा करतात, चांगली कामं करतात भाजपा मधे येत नाहीत त्यांना जेल मधे टाकतां..? ही कसली लोकशाही ? आपन १० वर्षात काहीच केल नाही म्हनुन तर एवढे पक्ष फोडावे लागत आहेत, ईतर पक्षातील ऊमेद्वार आयात करावे लागत आहेत, आज कॅंग्रेस मुक्त भारत म्हनता म्हनता कॅंग्रेस युक्त भाजप झाली आहे . आणी आज याच भाजपाने कॅंग्रेसच बॅक खाते गोठवले, त्यांच्या प्रचाराचं नियोजन थांबवलं. हि लोकशाही आहे का ? विरोधांकाना प्रचार सुद्धा करु देयचा नाही. त्यामुळे खर्या अर्थाने लोकशाही वाचवन्यासाठी देशातील सर्व छोट्या मोठ्या पक्ष येकत्र येतील आणी मोदिंना धडा शीकवतील हे नक्की.
कारण सध्या या देशामधे लोकशाही टीकवन्याचे आव्हान सर्वांसमोर आहे. आपल्या देशात आता सरकारच्या विरोधात बोलन्याचे स्वतंत्र्य राहीलेले नाही.
stay connected