मुंडे भगिणींनी आष्टा गटासाठी किती निधी दिला ते त्यांनी जाहीर करावा. - सावळेराम बळे
आष्टी/ प्रतिनिधी
सध्या लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.
महायुतीकडुन बीड लोकसभा मतदारसंघातुन पंकजाताईं उमेदवारी जाहीर झाल्यांनतर पहील्यांदाच त्यांचे आष्टी तालुक्यात आगमण झाले.त्याचबरोबर प्रथम धामणगांवात त्यांचे जोरदार स्वागत झाले.तसेच विविध ठिकाणी त्यांनी जोरदार भाषण केले व त्यांचे जोरदारही स्वागत झाले.
परंतु गेल्या दहा वर्षात त्यांनी ह.ना.आष्टा गटासाठी किती निधी मंजूर करुन दिला असा संतप्त सवाल मराठा योद्धे व सामाजिक कार्यकर्ते सावळेराम बळे यांनी केला आहे.
आष्टी तालुक्यामध्ये त्यांनी कोट्यवधी निधी मंजूर केला परंतु आष्टा गटासाठी किती निधी मंजूर केला?
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणासाठी अनेक मोर्चे,आंदोलने व उपोषण केले परंतु या भारतीय जनता पार्टीला कसलीही जाग आली नाही येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सुज्ञ मतदार या सत्तधार्यांना आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.असा कणखर इशाराही बीड लोकसभेचे भावी उमेदवार व सामाजिक कार्यकर्ते सावळेराम बळे यांनी दिला आहे.
stay connected