DHULE | निकालाच्या आधी राहुल नार्वेकर अचानक आजारी पडले हा सुद्धा भूकंप आहे - संजय राऊत

 DHULE | निकालाच्या आधी राहुल नार्वेकर अचानक आजारी पडले हा सुद्धा भूकंप आहे - संजय राऊत 



  मुख्यमंत्री दिल्ली वारी

-माझ्या प्रतिउत्तराला उत्तर देण्या इतके ते मोठे नाहीत, ते मुख्यमंत्री जरूर आहेत. यांना जो निधी मिळाला तो आमदार आणि खासदार विकत घेण्यासाठी मिळाला असल्याचा आरोप राऊत यांनी लावला असून, आमदारांचे 50 कोटी आणि खासदारांचे प्रत्येकी 100 कोटी हा निधी त्यांना दिल्लीतून नक्कीच मिळाला आहे.


 बावनकुळे वक्तव्य जानेवारी भूकंप

- जानेवारी मध्ये मोठा भूकंप होणार असल्याच बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्याचा संजय राऊत यांनी समाचार घेतला असून याबाबत बोलतांना राऊत म्हणाले, की ते स्वतःपासून बोलत आहेत, सर्व पक्षांमध्ये, राहुल नार्वेकर अचानक आजारी पडले हा सुद्धा भूकंप आहे. 10 तारीख हा निकालाचा दिवस आहे आणि ते आजारी पडले ही भूकंपाची सुरुवात आहे.


 मुंबई महानगरपालिका घोटाळा

- राज्याच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी निधी संदर्भात फार चर्चा करू नये, नाहीतर तुमचा निधी घोटाळा आम्हाला उघडा करावा लागेल, मुंबई महानगरपालिकेची 90 हजार कोटीची तिजोरी कोणी लुटली असा देखील प्रश्न यावेळी राऊत यांनी उपस्थित केला असून, राज्य सरकार तर्फे महाराष्ट्राची लूट सुरू असल्याचा आरोप देखील यावेळी राऊत यांनी लावला आहे.

- राज्यातील 14 महानगरपालिका निवडणुका तुम्ही पराभवाच्या भीतीने घेत नाहीत, असे म्हणत संजय राऊत यांनी तुमच्याकडे चिन्ह असलेली शिवसेना आहे तर मग निवडणुका का घेत नाहीत, असा प्रश्न भाजप समोर उपस्थित केला आहे.

 ईव्हीएम निर्णय

- ईव्हीएम संदर्भात दिल्लीच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला असून, ईव्हीएम संदर्भात पुढे नेमकी काय पावलं उचलायची त्यासंदर्भात आम्ही लवकर भूमिका घेऊ,

देशातल्या अनेक सामाजिक संस्थांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू केलं.  लोकांमध्ये जागरूकता निर्माण झालेली आहे. सॅम पित्रोदा ज्यांनी या देशामध्ये दूरसंचार क्रांती केली त्या सॅम पितृदाने सुद्धा स्पष्ट केलेल आहे.  की ईव्हीएम निर्दोष नाही ईव्हीएम मध्ये घोटाळा होऊ शकतो अशी त्यांची खात्री झालेली आहे आणि विशेषता मध्यप्रदेशचे निकाल ज्या पद्धतीने लावण्यात आले, लागले म्हणत नाही मी पाहता या देशांमध्ये लोकशाही पद्धतीने जी  मतदान प्रक्रिया आहे ती निर्दोष नाही हे स्पष्ट झालेलं आहे. आजच आपण सामनामध्ये याबाबत पुरावा सहित स्पष्ट लिहिलेलं आहे की ईव्हीएम चा घोटाळा कसा होतो आणि केला जातो.  मोदी शहांचं सरकार काही एजन्सीच्या माध्यमातून ओपिनियन पोल समोर आणतात यातून वातावरण निर्मिती करतात, आणि त्यानुसार भारतीय जनता पार्टीचे दोन लोक एक आकडा जाहीर करतात त्यानुसार ईव्हीएम सेट केले जातात, या देशातील 30 टक्के ईव्हीएम जिथे भारतीय जनता पक्ष काठावर आहे तिथे ईव्हीएम सेट करून कशा पद्धतीने मतदान प्रक्रियेत घोळ घातला जात आहे हे मी आज पुराव्यासहित लिहिले आहे.

 पंतप्रधान त्रिसूत्री

- घोषणा आश्वासन आणि प्रचार ही पंतप्रधानांची त्रिसूत्री असून त्यांनी शपथ घेतल्यापासून दहा वर्षात त्यांनी फक्त प्रचारच केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी लावला आहे, तसेच निवडणुकीच्या तीन महिने आधी पंतप्रधान आणि मंत्र्यांना प्रचारासाठी बंदी घातली पाहिजे अशी भूमिका बाळासाहेब ठाकरे यांची होती आणि त्यांनी निवडणूक आयोगाला या संदर्भात मागणी देखील केलेली होती, राज्य सरकारचा पैसा ही मंडळी प्रचार करण्यासाठी वापरत असल्याने हा सर्व खर्च त्यांच्या पक्षाकडून वसूल करण्यात यावा अशी देवी देखील भूमिका आमची असणार असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केले आहे,









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.