KALYAN : नवर्षाच्या स्वागताचा आनंद लुटा मात्र अनुचित प्रकार घडल्यास कारवाई : अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांचे आवाहन

 KALYAN : नवर्षाच्या स्वागताचा आनंद लुटा मात्र अनुचित प्रकार घडल्यास कारवाई : अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांचे आवाहन



 कल्याण आणि उल्हासनगर पोलिस परिमंडळाच्या हद्दीत थर्टी फर्स्टसाठी १२०० पोलिसांचा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठिकठिकाणी नाका बंदी करण्यात आली आहे. नागरीकांनी नववर्ष स्वागताचा आनंद लुटावा. मात्र अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाईल असे आवाहन अपर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी केले आहे.थर्टी फर्स्ट रात्री ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. विविध हा’टेल्स, धाबे यांना पोलिसांनी योग्य त्या सुचना दिल्या आहेत. रात्रीच्या वेळी दारु पिऊन गाडी चालवू नये. हेल्मट घालूनच गाडी चालवावी. दारु पिऊन गाडी चालविल्यास ब्रेथ अ’नालझर यंत्राद्वारे तपासणी केली जाईल. दारु पिऊन गाडी चालविल्याचे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नववर्ष स्वागताचा आनंद लूटावा. मात्र कायद्याचे उल्लंघन करु नये असे अप्पर पोलिस आयुक्त शिंदे यांनी सांगितले. कल्याण आणि उल्हासनगर पोलिस परिमंडळाच्या हद्दीत प्रत्येकी आठ पोलिस ठाणी येतात. या ठिकाणी १२०० पोलिस तैनात करण्यात आले आहेत. कोंबिंग आणि सर्च ऑपरेशन आज रात्रीपासून सुुरु करण्यात आले आहे. १२०० पोलिसांमध्ये साध्या वेशातील पोलिसही फिरणार आहेत. तसेच दोन्ही पोलिस परिमंडळाच्या हद्दीतील सीसीटीव्ही द्वारेही नववर्षाच्या स्वागतावर नजर ठेवली जाणार आहे. नागरीकांनी नववर्षाचे स्वागत करीत असताना त्यांच्या सुरक्षेची हमी पोलिस प्रशासनाची असेल असे अप्पर पोलिस आयुक्त शिंदे यांनी सांगितले.यासोबतच अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी क्राईम रिपोर्ट देखील मांडला.कल्याण आणि उल्हासनगर पोलिस परिमंडळात २०२३ मध्ये गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण ७८ टक्के आहे. मागच्या वर्षी २०२२ मध्ये हेच प्रमाण ७६ टक्के होते. यंदा दोन टक्क्यांनी हे प्रमाण वाढले आहे असल्याची माहिती अपर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी दिली आहे.

वर्षभरातील गुन्हेगारी घडामोडीचा रिपोर्ट आज सायंकाळी अपर पोलिस आयुक्त शिंदे यांनी मांडला.घरफाेडी, चोरी, जबरी चोरी या गुन्हयात चोरीस गेलेले दागिने, रोख रक्कम, वाहने, मोबाईल असा १ कोटी ४१ लाख ९७ हजार ३४४ रुपये किंमतीचा मुद्देमाल उल्हासनगर परिमंडळातील नागरीकांना परत केला आहे. तर कल्याण परिमंडळातील नागरीकांना २ कोटी ४ लाख ४८ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात पोलिसांना यश आले आहे. संघटीत गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी २०२३ मध्ये २१ गुन्हयात मोक्का कायद्याचा अंतर्भाव करुन ४९ आरोपीना अटक करण्यात आली. २०२२ मध्ये २२ गुन्हयात अशा प्रकारची कारवाई करुन ८१ आरोपींना अटक केली होती. या माध्यमातून संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड करण्यात आला आहे. २०२३ मध्ये वाहन चोरीचे ७२१ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी २९९ गुन्हे उघडकीस आले. २०२२ सालच्या तुलनेत वाहन चोरीच्या गुन्ह्यात ८४ गुन्ह्यांची घट झाली आहे. २०२३ मध्ये घरफोडीचे ३४६ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी १८७ गुन्हयांची उकल करण्यात आली. चैन स्न’चिंगचे ७५ गुन्हे घडले होते. त्यापैकी ६० गुन्हे उघड झाले आहेत. गुन्हे उघड येण्याचे प्रमाण ८० टक्के आहे. या गुन्हयातील ७३ आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून पोलिसांनी ३८ लाख ३६ हजार ९६ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चैन स्न्’चिंगच्या गुन्ह्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत ५६ गुन्हयाची घट झाली आहे. महिलासंबंधित बलात्कार, विनयभंग, छळवणूक, अपहरण यासारखे १ हजार २०२ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी ९६ टक्के गुन्हे उघडीस आले आहेत. महिलांच्या तक्रारींना प्राधान्य देऊन आरोपींच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. २०२३ मध्ये दारु बंदीचे ५७५ गुन्हे दाखल झाले. मागच्या वर्षीच्या तुलनेत ६ गुन्ह्यांची वाढ झाली आहे. वर्षभरात ८ वेळा आ’ल आऊट आ’परेशन राबिवले. २९ अवैध शस्त्रे हस्तगत करण्यात ाली. १८४ फरार असलेले आणि २३२ पाहिजे असेलेल आरोपी चेक करण्यात आले. अवैध दारुच्या १८३, अवैध जुगाराच्या ४७ केसेस करण्यात आल्या. अंमली पदार्थ सेवन केलेल्या १२३ केसेस केल्या. नाकाबंदी दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ््या १ हजार ६३७ चालकांच्या विरोधात केसेस करण्यात आल्या. त्यांच्याकडून १४ लाख ३८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती अपर पोलिस आयुक्त शिंदे यांनी दिली आहे.










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.