50 दिवसात अंमलबजावणी - अखेर 21 व्या दिवशी उपोषण सुटले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची तीन तासानंतर मध्यस्थीला आले यश ! विखे पिता-पुत्रांविरोधात निषेधाच्या घोषणा

 50 दिवसात अंमलबजावणी - अखेर 21 व्या दिवशी उपोषण सुटले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची तीन तासानंतर मध्यस्थीला आले यश !
विखे पिता-पुत्रांविरोधात निषेधाच्या घोषणा 



- - - - - - - - - - - - - - - - - - - - - 

जामखेड  - धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी यशवंत सेनेने 6 सप्टेंबर पासून चोंडी येथे सुरू केलेले उपोषण 

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या बरोबर तीन तास चर्चा झाली. अखेर 50 दिवसात आरक्षणाची अंमल बजावणी केली जाईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी 21 व्या दिवशी उपोषण माघे घेतले. सरकार आणि अंदोलक यांच्यात आ. प्रा. राम शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान मंत्री गिरीश महाजन व आंदोलक चर्चा लांबत चालली यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले होते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे यांनी उपोषणकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करून त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. 



    यशवंत सेनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चोंडी या जन्मगावी किर्ती स्तंभाशेजारी 6 सप्टेंबर पासून धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केले होते. यशवंत सेनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांडगे, राष्ट्रीय उपाध्यक्ष आण्णासाहेब रुपनर, प्रदेश सचिव सुरेश बंडगर, नितीन धायगुडे, समाधान पाटील, बाळू गायके  उपोषणाला बसले होते. उपोषणकर्ते सुरेश बंडगर व आण्णासाहेब रूपनवर यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. सदर अंदोलनाची सरकारने तातडीने दखल घ्यावी व योग्य तोडगा काढावा यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी सरकारचे लक्ष वेधले होते. 

      ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी चोंडीत येऊन अंदोलकांशी संवाद साधला होता. त्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यां बरोबर बैठक झाली होती. सदर बैठक निष्फळ झाली होती. आ. शिंदे यांनी पुन्हा सरकारच्या वतीने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना आज 26 रोजी चोंडीतील अंदोलनस्थळी आंदोलकाबरोबर बोलणी केली.तब्बल 3 तास चर्चा झाली. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी दूरध्वनीवरून अंदोलकांशी चर्चा घडवून आणली.

       चोंडीतील अंदोलकांच्या ज्या मागण्या आहेत, त्या मान्य करण्यात आल्या. त्यानंतर सरकारच्या वतीने लेखी पत्र देण्यात आले. त्यानंतर उपोषण सोडण्यावर अंदोलकांनी सहमती दर्शवली. 

    यावेळी माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, आमदार प्रा.राम शिंदे, आमदार प्रकाश शेंडगे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, डाॅ स्नेहा सोनकाटे, सह धनगर समाजाकडून अनेक नेते तसेच शेकडो धनगर समाज बांधव यावेळी उपस्थित होते.  

धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेचे चौंडीत गेल्या 21 दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. या उपोषणाकडे नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे यांनी पाठ फिरवल्याने विखे पिता-पुत्रांविरोधात निषेधाच्या घोषणा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व आ. राम शिंदे यांच्या समोर देऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. 

प्रतिनिधी नासीर पठाण सह पत्रकार आशोक निमोणकर जामखेड .








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.