डोंगरगण पाठोपाठ देसूर मध्येही ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल
---------------------
आष्टी/प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथील घटना ताजी असतानाच तालुक्यातील देसूर येथेही दिनांक ७ मे रोजी सायंकाळी पाच वाजता फिर्यादी कोंडीबा गिरजा कांबळे यांचे फिर्यादीवरून माझा मुलगा संजय व लक्ष्मण या दोघांच्या मुली या यात्रेच्या निमित्ताने गावामध्ये गेले असता गावामध्ये त्यांची छेड काढण्यात आली त्यामुळे त्या घरी रडत आले असता माझा मुलगा संजय हा आरोपीस जाब विचारण्यास गेला असता त्याला आरोपीने दमदाटी करून धेडग्या तुला काय करायचे ते कर तुला घरी येऊन मारू असे म्हणाले माझा मुलगा संजय घरी आला असता मला सर्व हकीकत सांगितली रात्री नऊ वाजता अचानक ज्ञानदेव दिनकर भगत, सुभाष शिवाजी भगत, शिवराज मल्हारी भगत, अभिषेक सुभाष भगत ,सुनील सर्जेराव भगत, लक्ष्मण सुनील भगत ,अनिकेत सुभाष भगत, तुषार अशोक भवर, शरद सुरेश भगत, मल्हारी उत्तम भगत , सर्व राहणार देसूर तालुका आष्टी , तसेच दादासाहेब विक्रम पोकळे, संतोष चंद्रकांत पोकळे ,एकनाथ पांडुरंग पोकळे, गणेश तुकाराम रेपाटे ,सोनाजी अशोक पोकळे राहणार बेलगाव तालुका आष्टी जिल्हा बीड यांचे विरोधात आष्टी पोलिस ठाण्यात कलम १४३ १४७ १४८ १४९ ३२४ २३२ ५०४ ५०६ अंतर्गत ॲट्रोसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच त्यापैकी ज्ञानदेव दिनकर भगत हा मनाला की तुला जीवच मारू धेडग्या तुला राहू देणार नाही तुम्ही लय माजलात असे म्हणून लाथ मारली मी खाली पडलो त्याने काहीतरी धारदार शस्त्राने माझ्या उजव्या मांडीवर मारून जखमी केले खूप जास्त रक्तस्त्राव झाल्याने माझी मुले भांडण सोडण्यासाठी आले असताना मग माझ्या मुलांनाही लाथा बुक्क्या व काठीने मारहाण करण्यात आली त्याचबरोबर घरातील अनेक महिला पुरुषांनाही मारहाण करण्यात आले जातिवाचक शिवीगाळ करून आरोपींनी रात्रीचा फायदा घेत दहशत माजवली असे होऊन सुद्धा फिर्याद घेण्यास बराच काळ उशीर झाला फिर्याद झाल्याच्या नंतर आरोपींना आत्तापर्यंत अटक करण्यात आलेली नाही आरोपी हे मोकाट असून ते फिर्यादी वरती दबाव तंत्राचा वापर करून फिर्याद मागे घेण्यास वारंवार प्रयत्न करत आहेत आरोपींवरती कारवाई नाही झाल्यास फिर्यादी उप पोलीस उपविभागीय कार्यालयाच्या समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे त्याचबरोबर कुटुंब भयभीत झाले असून त्यांना संरक्षण देण्याची मागणी होत आहे यामुळे आरोपींना लवकरात लवकर अटक करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा हीच मागणी सर्व स्तरातून होत आहे.
stay connected