*शिक्षक सतिष राजगुरू यांच्या सतर्कतेमुळे वाचले अनेकांचे प्राण...*

 *शिक्षक सतिष राजगुरू यांच्या सतर्कतेमुळे वाचले अनेकांचे प्राण...*



*तेजवार्ता प्रतिनिधी संदिप जाधव उंदरखेल/ आष्टी*

सविस्तर माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील नगर बीड रोडवरील उंदरखेल फाट्यावरून 

ऊसाने भरलेला ट्रक जात असताना तो ट्रक विजेच्या तारेला धडकला असता विजेची तार खाली कोसळली.व त्या तारेमधून जाळ निघू लागला त्या तारेचे कनेक्शन चालुच होते.

ती तार रस्त्याच्या मध्यभागी पडली होती.

अचानक उंदरखेल येथील शिक्षक श्री अडबंगीनाथ विद्यालय कारखेल खुर्द येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.ते त्यांच्या मुलीला हॉस्पिटल मध्ये घेऊन जात असताना त्यांच्या निदर्शनास हा सर्व प्रकार आला.व त्यांनी त्यांची स्वतःची दुचाकी गाडी रस्त्याच्या मध्यभागी लावली व येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला व वायरमन दत्ता वामण यांना फोन करून घटनेची संपुर्ण माहीती दिली लगेच वायरमन दत्ता वामण तेथे आले व विजेच्या तारेचे कनेक्शन बंद केले व होणारा अनर्थ टळला. व येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना रस्ता मोकळा झाला. 

शिक्षक सतिष राजगुरू यांच्या सतर्कतेमुळे अनेकांचे जीव वाचले, त्यांच्या या कार्यामुळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.







 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.