भा.सा.व सांस्कृतिक मंच नागपूरच्या वतीने ऑनलाइन काव्य संमेलनाचे आयोजन
भा.सा.व सांस्कृतिक मंच नागपूरच्या वतीने ऑनलाइन काव्य संमेलनाचे आयोजन आज दिनांक ०१|०१|२०२३रविवारला समुहाच्या मुख्य प्रशासिका/ नागपूर मंच जिल्हाध्यक्षा
सौ. संध्या रमेश लायस्कर.यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार घेण्याचे ठरविले.आणि समुहातील सर्व सारस्वतास संमेलनात सादरीकरण करण्यासाठी प्रवृत्त केले.
आजच्या ऑनलाइन काव्य संमेलनाचे अध्यक्षपद मा. प्रा.भारत मधुकर झाडे यांनी भूषविले.काव्य संमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून फ्रिडम स्टोरी संस्थेचे संस्थापक विशाल सिरसट सर आणि विजय जायभाये सर लाभले होते.
सर्वप्रथम मा.अध्यक्षांसह प्रमुख विशाल आणि विजय सरांनी आभासी दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उदघाटन केले.मा.हेमंत देवगीरकर विदर्भ प्रदेशाध्यक्ष यांची उपस्थिती आम्हा सर्वानाच सुखावून गेली.
संमेलनाच्या कार्यक्रमासाठी सौ वैशाली राऊत आणि नीता पाटणे यांनी अतिशय ओजस्वी वाणीने संचलनाला सुरुवात केली. सर्व प्रथम पाहुण्यांसमोर सौ. संध्या लायस्कर यांनी सुरेल स्वरात स्वरचित स्वागत गीत गायले. यानंतर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन यथासांग शब्द सुमनांनी स्वागत केले.
सौ.संध्या लायस्कर यांनी पाहुण्यांचा परिचय अगदी सहज सोप्या भाषेतून व्यक्त केला.त्यानंतर लगेचच
सौ.पाटुकले यांच्या रचनेने काव्य सादरीकरणाची सुरुवात झाली. आणि त्यानंतर राधाताई खानझोडे.नागपूर यांच्या नळावरचे भांडण सर्वांना मंत्रमुग्ध करून गेले.
वैशाली राऊतचे प्रेमकाव्य सगळ्यांची मने जिंकून गेलेत ,अशी सर्वच काव्य सादरीकरण अतिशय सुरेख आणि भावपूर्ण विषयावर सादर झालीत.
त्यानंतर लगेचच संमेलनाध्यक्ष सरांचे अध्यक्षीय भाषण झाले. भारत सरांनी त्यांच्या भाषणातून काव्य लिहीण्याची अतिशय सोपी संकल्पना मांडली. गुणगुणत काव्य लिहील्यास सुरेल काव्य जन्मास येते. हे त्यांनी खूप छान शब्दात पटवून दिले. कवि हेमंत देवगीरकर सरांचेही अतिशय मोलाचे मार्गदर्शन लाभलेत.
जवळपास २५ते ३० सारस्वतांनी आपल्या स्वरचित काव्य रचना सादर केल्यात. मा. लीलाधर दवंडे सरांनी संमेलनात उपस्थित राहून सक्रिय सहभाग घेतला.प्रत्येकांच्या रचनांचे स्वागत करीत त्यानी नवकवींचा उत्साह वाढविला. आणि स्वतः बालपण या विषयावर अतिशय मार्मिक काव्य सादरीकरण केले.
सर्व रचनांचे यथायोग्य परीक्षण करण्यासाठी लाभलेले मा.राहूल सपाटे सरांचेही त्रिपदीराना काव्य नववर्षाचे स्वागतार्ह सादरीकरण करण्यात आले.अंजली नालमवार, माया मृत्यलवार, निता कांबळे,वसुधा येनकर, जेतश्री गोरे,तनुश्री पिसाट,नीता पाटणे ,केतकी भिडे,छाया पिंपळे,रक्षा चिलवेरवार, शोभा वेले यांनीही सुरेख रचना सादर केल्यात.सौ.राधाताई खानझोडे.यांचे विशेष मार्गदर्शन लाभलेत.
काही सारस्वतांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सौ. वंदना हिरूडकर यांनीआम्ही बाई बायका ही विनोदी रचना वअतिशय सुरेख असे संमेलनाचाआढावा घेणारे काव्य सादर केले.
शेवटी समुहाच्या उपप्रमुख शोभाताई वेले यांच्या आभार प्रदर्शनाने साहित्य संमेलनाची सांगता झाली.
सहभागी सर्व कवी आणि कवयित्री यांचे मनस्वी आभार मानले. कार्यक्रम अतिशय सुंदर आणि बोधप्रदअश्या काव्यातून एकंदर खूप खूप स्पृहणीय असा साजरा झाला.
*नव्या वर्षाचा नवा हर्ष*
*सारस्वतांचा विलसला*
*नागपूर साहित्य संमेलनी*
*नवकवींचा आनंद बरसला* ...
*आयोजिका*
सौ.संध्या रमेश लायस्कर,
जिल्हाध्यक्ष भा.सा.व सां.मंच नागपूर
stay connected