त्रिदल सैनिक सेवा संघ लोणी गट अध्यक्षपदी.. कॅप्टन श्री. विष्णू पवार साहेब यांची निवड.
भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेल्या जवानांची ..
त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या दौलावडगाव शाखेच्या उद्घाटन प्रसंगी भव्य सैनिक मेळाव्याचे आयोजन काल नूतन वर्षाच्या प्रारंभी दि. 1.1. 2023 रोजी करण्यात आले होते.
याप्रसंगी लोणी येथील निवृत्त कॅप्टन श्री. विष्णू पवार साहेब यांची संघटनेच्या लोणी गटाच्या अध्यक्षस्थानी नियुक्ती करण्यात आली.
विष्णू पवार साहेब हे नेहमीच लोणी गटातील त्याचप्रमाणे गावातील कुठलेही सामाजिक अथवा धार्मिक कार्य असो त्यामध्ये हिरीरीने सहभाग घेत असतात. सैन्य दलामध्ये कार्यरत असताना त्यांना भारतीय लष्कराकडून अनेक देशांमध्ये शांती सेनेच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली. एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची सैन्यदलात वेगळी ओळख होती. निवृत्त झाल्यानंतर चांगल्या प्रकारचे पेन्शन असताना सुद्धा कुठल्याही शहराकडे न वळता त्यांनी मातृभूमी मध्येच राहणे पसंद केले. नेहमीच सामाजिक चळवळीमध्ये ते सक्रिय असतात. त्याचप्रमाणे गावातील सर्वच धार्मिक क्षेत्रातील किंवा इतर सामाजिक कार्यात सुद्धा ते स्वताला झोकून देत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन लोणी गटातील जवळपास 30 गावांमधून सर्व सैनिकांच्या माध्यमातून त्यांची एक मुखाने निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र काल दौलावडगाव येथे महाराष्ट्र राज्य त्रिदल सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. संदीप भाऊ लगड व संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष श्री.अंकुश खोटे साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जवळपास 500 पेक्षा जास्त संख्येने माजी सैनिकांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य त्रिदल सैनिक सेवा संघ अध्यक्ष श्री. संदीपभाऊ लगड साहेब हे होते तर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार साहेबराव दरेकर व आष्टी ता. पंचायत समिती मा. सभापती श्री. अशोक इथापे, संघटनेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष श्री. नवनाथजी भगत साहेब, राज्य कोअर कमिटी अध्यक्ष कटके साहेब, कृषी रत्न पिसोरे अण्णा, तालुक्यातील सर्व कट्टर प्रमुख त्याचप्रमाणे दौलवडगाव परिसरातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी सर्वच मान्यवरांनी आपापले विचार मांडताना म्हटले की..
सैन्य दलातून निवृत्त झालेल्या जवानांनी तरुणांना मार्गदर्शन करून सैनिकी क्षेत्रामध्ये भरती होण्यासाठी योगदान द्यावे, कारण ज्या देशाची सैनिक क्षमता आणि ताकद जास्त आहे तोच देश इथून पुढे सुरक्षित राहू शकतो अशा प्रकारे मनोगत व्यक्त केले.
stay connected