* *पिसाळलेल्या कुत्र्याने घातला धुमाकूळ नागरिक भयभीत**
...............................................
एका रात्रीत दहा पेक्षा जास्त जनवारांना चावा घेतला
ऊंदरखेल /प्रतिनिधी.शेख सिराज
दि 16 जानेवारी रोजी आष्टी तालुक्यातील ऊंदरखेल येथे काल रात्री एक पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालून तब्बल दहा पेक्षा जास्त जनवारांना चावा घेऊन त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली . यातील काही जनवारांना जास्त प्रमाणात इजा झाल्याने प्रकृती खराब आहे.आष्टी तालुक्यातील ऊंदरखेल येथील मुक्तसंचार करणाऱ्या एका पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक गावात धुमाकूळ घातला दि16 जानेवारी रोजी रात्री दोन ते पाच यावेळी सैरावैरा पळत या पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल दहा पेक्षा जास्त जनावरांना चावा घेतला अचानक गोठ्यात असलेल्या गुरांच्या धडपड ल्याने पाहीले असता बेलगाम कुत्रा हा गुरांनवर हल्ला करत असल्याचे दिसून आले. बघता बघता काही क्षणातच पिसाळलेल्या कुत्र्याने गावातील वेगवेगळ्या ठिकाणावरील तब्बल दहा पेक्षा जनावरांना चावा घेऊन त्यांना गंभीर जखमी केल्यांने ग्रामस्थांन मध्ये धांदल उडाली.
पिसाळलेल्या कुत्रा असल्यास ते पळुन पळुन धापा टाकत पाच सहा दिवसातच मरण पावतात
उत्तर द्याहटवाstay connected