शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी शिक्षक आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शाळांचा "आमदार श्री" पुरस्कार देऊन गौरव करणार.. आ.सुरेश धस यांची घोषणा..

 शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी शिक्षक आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शाळांचा "आमदार श्री" पुरस्कार देऊन गौरव करणार.. आ.सुरेश धस यांची घोषणा..

********************************





*********************************

आष्टी (प्रतिनिधी)

 जगातील वेगवान घडामोडी अभ्यास आणि नवनवीन आव्हाने पेलण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्तेचा शैक्षणिक परिणाम लक्षात घेऊन अभ्यास करावा आणि आपले भवितव्य घडवावे असे मत आ.सुरेश धस यांनी व्यक्त केले. 

आष्टी येथे अनिशा इंटरनॅशनल स्कूल येथील प्रांगणात तालुक्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभ सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.

 यावेळी व्यासपीठावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून वन विभागामध्ये अधिकारी पदावर नियुक्त झालेल्या अश्विनी परकाळे जरेवाडी पॅटर्नचे संदीप पवार, गटनेते खंडू जाधव,श्रीहरी गीते,जयशिंग गव्हाणे,मा.सरपंच अनिल ढोबळे,विस्तार अधिकारी मनोरंजन धस,चेअरमन मारुती पठाडे,महेश शिंदे,रावसाहेब शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी त्यांना घडवणारे शिक्षक आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शाळा यांना आगामी वर्षापासून" आमदार श्री " पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे अशी घोषणा आमदार सुरेश धस यांनी केली. उत्कृष्ट काम करणाऱ्या शाळांसाठी आमदार चषक स्पर्धा सुरू करणार ज्यामुळे गुणवत्तेसाठी स्पर्धा सुरू होईल गुणवंत विद्यार्थी हे देशाचे आधारस्तंभ आहेत त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन स्वतःचे आई वडिलांचे शाळेचे व आपल्या तालुक्याचे नाव उज्वल करावे.

आष्टी तालुका हा गुणवंतांची खाण आहे. यूपीएससी परीक्षेत मतदार संघातील चार विद्यार्थी आयएएस व आयएफएस म्हणून निवडले गेले आहेत.आणि या वर्षीच्या  गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारातून पुढील विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी यासाठी या गुण गौरव समारंभाचे आयोजन केले आहे असे प्रतिपादन करताना पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचे भारत हा विश्व गुरु व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असून त्यासाठी संशोधन क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करावे त्याचबरोबर आर्थिक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी त्याही क्षेत्राचा अभ्यास करण्याची आवश्यकता असून केवळ नोकरीच्या मागे न लागता आपण माणूस म्हणून श्रेष्ठ होण्याचा प्रयत्न करावा आपल्या परिसरातील ऊसतोड कामगारांच्या हातातील कोयता बंद करण्यासाठी.. आणि त्यांच्या मुलांच्या जीवनात हा प्रसंग येऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या असल्यामुळे त्या शाळांचे शिक्षण दर्जेदार होण्यासाठी जरेवाडी पॅटर्न राबवण्यास आपण सुरुवातीपासून प्रयत्न केले  असल्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ झाली असून हजारो विद्यार्थी पुन्हा जिल्हा परिषद मध्ये आले आहेत असे सांगितले. या गुणगौरव  कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून तालुक्यातीलच रहिवासी असलेल्या कु.अश्विनी देवराव परकाळे आय.एफ. एस. यांनी स्पर्धा परीक्षे विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना चिकाटी सातत्य आणि गोरगरीब आई-वडिलांना समोर ठेवून कष्ट करावे त्यातून यश प्राप्त होते असा मौलिक सल्ला आ. धस यांनी शेवटी बोलताना दिला.

यावेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करून आयएफएस झालेल्या अश्विनी देवराव परकाळे यांनी विद्यार्थ्यांना यशाची गुरुकिल्ली दिली. तसेच अभ्यासातील बारकावे समजावून सांगत सविस्तर मनोगत व्यक्त केले.



हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे, सुरेश पवार, मनोरंजन धस, सूर्यकांत मोकाशे, महेश शिंदे, आप्पा काळे, सतीश दळवी, सोमनाथ वाळके, विकास धस,दीपक सोले, सचिन रानडे, सोमनाथ भोसले,वाघमारे, नरवडे,संतोष पोकळे, थोरात,जेवे,अनंत्रे, काकडे, लगड, 

गणेश शिंदे, राजु शिंन्दे ऋषी खिळे, .गण प्रमुख   अशोक दहातोंडे,शिवाजी थोरात,विलास सिरसाठ ,वायभासे, रामदास शेंडगे, राहुल सुरवसे,राजु खुरांगे ,अतुल खराडे,भाऊ झांजे,रामेश्वर चव्हाण,बिट्टु पोकळे,संजय पाटील,संजय ढोबळे,अन्सार शेख ,ईस्लाम शेख, संदीप कारंजकर, विठठल गर्जे ,विजय मरकड ,धनंजय तरटे,उद्धव बेंद्रे ,खंडु जाधव, शिवाजी घुले ,रावसाहेब मुटकुळे , देविदास साप्ते ,दत्ता गर्जे ,मंजुर शेख,निशांत जेवे प्रविण झांबरे, किशोर झरेकर आदींनी परिश्रम घेतले.

या गुणगौरव सोहळ्याचे सूत्रसंचालन बाळासाहेब तळेकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी मनोरंजन धस यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.