शरीर आणि मन यांचा संतुलित विकास करण्यासाठी योगा आवश्यक. - श्रीम.किरण घाडगे.
योगा हा भारताचा प्राचीन वारसा आहे.शरीर आणि मन यांचा संतुलित विकास करण्यासाठी योगा आवश्यक आहे .असे मत योगा शिक्षिका श्रीम.किरण घाडगे यांनी योग दिनानिमित्त बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन चव्हाण यांनी व्यक्त केले.
योगा हा मानवजातीसाठी एक उत्तम देणगी आहे,जी आपल्याला निरोगी राहण्यासाठी मदत करते.योगा हा आपल्या भरताने जगाला दिलेली एक अमूल्य ठेवा आहे. सध्याच्या धावपळीच्या युगात मानसीक ताण तणाव कमी करण्यासाठी, तणावमुक्त होण्यासाठी चांगल्या आरोग्याची आवश्यकता आहे. यासाठी योगा नियमित करावा ताणतणाव कमी करून मानसिक दृष्ट्या सुदॄढ व्हावे.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रविण कुमार पांगे यांनी केले.
कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक युन्नूस तांबोळी, महादेव घोगरे, सौ.प्र.रा. इंगोले, श्रीम.आं.शा.जैन,कॄ.तु.तुपे, सौ.क.सं.आवटे , पालक, विद्यार्थी, शिक्षणप्रेमी उपस्थित होते.
stay connected