वादळी वाऱ्यासह पावसाचा धूमाकूळ : शेतकरी संकटात
कडा/ वार्ताहर
-----------------
आष्टी तालुक्यात बुधवारी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे उन्हाळून पडली, शेतात विजेचे खांब वाऱ्याने कोसळली, विजेच्या तारा तुटल्या, अनेक घरावरचे पत्रे उडाली. वादळी पावसामुळे सर्वसामान्य कुटुंबीयांचे संसार मात्र उघड्यावर पडले आहेत. तर दुसरीकडे मोसंबी, आंबा, लिंबोणी या फळ पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील दोन दिवसापासून वादळामुळे विजेचे खांब कोसळून पडल्यामुळे आष्टी, कड्यासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश झगडे यांनी केली आहे.
stay connected