जलजीवनच्या कामाची चौकषी करावी व पिंपरखेडची पाणीटंचाई ची समस्या दूर करावी यासाठी विशाल मुरलीधर चव्हाण यांचा आत्मदहन करण्याचा इशारा
आष्टी तालुक्यातील पिंपरखेड येथे जलजीवनच्या कामाची चौकषी करावी व पिंपरखेडची पाणीटंचाई ची समस्या दूर करावी यासाठी विशाल मुरलीधर चव्हाण यांनी दि . 21 मे रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे . निवेदनात त्यांनी म्हटले आहे की मी विशाल मुरलीधर चव्हाण, आज 19 मे 2025 रोजी पिंपरखेड गावच्या जलजीवन चे काम पुर्ण झाले . ग्रामसेवक साहेब तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य , सरपंच ,उपसरपंच या कामाची जबाबदारी घेत नसून गावाला पाणी पुरवठा होत नाही.
या कारणामुळे गावकरी मंडळी चे पाण्यावाचून हाल होत असून याप्रकरणाची जबाबदारी कोणी घेत नाहीत व काम पूर्ण नाही असे लेखीही देत नाहीत . या प्रकरणी दि. 21 मे 2025 रोजी मी विशाल मुरलीधर चव्हाण स्वतः आत्मदहन करणार आहे. याप्रकरणाची सर्वस्वी जबाबदारी ग्रामसेवक व सरपंच , उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य राहतील. असे निवेदनात विशाल चव्हाण यांनी म्हटले आहे .
stay connected