आगामी दीपावलीचा "आकाश दिवा " घरकूल लाभार्थ्यांच्या स्वतःच्या घरात लागावा..
---आ.सुरेश धस
**********************************
" दिवाळी नवीन घरकुलात.". यासाठी
कार्यशाळेचे आयोजन..
************************************
आष्टी (प्रतिनिधी) ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांच्या घरकूल योजनेअंतर्गत सर्वसामान्य लाभार्थ्यांच्या स्वतःच्या नवीन घरात दिवाळी साजरी करून त्यांच्या जीवनात नवचैतन्य व भरभराटी व्हावी अशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भावना असून ..त्यानुसार..
आगामी दीपावलीचा आकाश दिवा, आणि पणती घरकूल लाभार्थ्यांच्या स्वतःच्या घरात लागावा असा मानस आष्टी मतदार संघाचे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केला...
आष्टी येथील भैरवनाथ मंगल कार्यालयात आयोजित ग्रामविकास व पंचायत राज विभाग जिल्हा परिषद बीड जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा बीड यांच्यावतीने येणारी..
" दिवाळी नवीन घरकूलात" "या अभियानांतर्गत.. आष्टी, पाटोदा, शिरूर (कासार) या तीन ही तालुकास्तरीय कार्यशाळेत आमदार सुरेश धस बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर बीड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने, प्रकल्प संचालक संगीता देवी पाटील, सहाय्यक संचालक डी.बी. क्षीरसागर,आष्टी गटविकास अधिकारी जी. व्ही.बागलाने,पाटोदा गटविकास अधिकारी वानखेडे,नलावडे, सभापती बद्रीनाथ जगताप,जेष्ठ नेते भाऊसाहेब भवर, विनायक जंजिरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार धस म्हणाले,
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची ही अतिशय महत्त्वाची घरकुलाची योजना आहे.
आपल्या मतदारसंघात जे अपूर्ण कामे आहेत ते लवकर लवकर पूर्ण करावेत.
ग्रामरोजगार सेवकांनी सार्वजनिक व वैयक्तिक लाभाच्या लाभार्थ्यांची पिळवणूक थांबवावी असे सक्त आदेश देऊन अधिकारी व ग्रामसेवक यांनी या घरकुल योजनेत होणाऱ्या पुरवणुकीत लक्ष देऊन स्वतः जबाबदारीने काम करावे यशवंत चव्हाण घरकुल योजनेत मतदार संघात 28 हजार घरकुले मंजूर आहेत. यामध्ये अनियमितता दिसून येत असल्याने बोगस मंजूर झालेल्या घरकुलाची चौकशी लावून पारदर्शकता आणू या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना माहिती देणार आहे. नवीन घरकुलाच्या सर्व्हेमध्ये देखील कोणताच लाभार्थी वंचित ठेऊ नका.
नवीन मंजूर असलेले प्रशासनाच्या माध्यमातून आपण सर्व घरकुले पुर्णत्वास घेऊन जाऊ. सर्वसामान्य हा घरकुलाचा लाभार्थी असतो त्यासोबत कंत्राटी कर्मचारी यांच्या वागणुकी बरोबर नाहीत. त्यांनी त्या येणाऱ्या काळात सुधाराव्यात अन्यथा मी वेगळा निर्णय कंत्राटी कर्मचाऱ्याबाबत घेईल असा इशारा दिला मुख्य कार्यकारी अधिकारी जीवने साहेब यांचे देखील मी कौतुक करतो की त्यांनी पदभार स्वीकारताच प्रलंबित असलेले दहा हजार घरकुले मार्गी लावले. येणाऱ्या दिवाळीपर्यंत आपल्याला सर्वांना मिळून माझी माय माऊली नवीन घरकुलात आणायची आहे हे ध्येय ठेवून काम करायचे आहे. असे सांगत वैयक्तिक लाभांच्या योजनांचे हजेरी पत्रक तात्काळ भरावे आहे असे शेवटी सांगितले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने म्हणाले की,लोकप्रतिनिधी आम्हाला सहकार्य करत आहेत.बीड जिल्ह्यात 1 लाखा पेक्षा जादा घरे मंजूर आहेत.
फेब्रुवारी पासून 9500 हजार घरकुले पुर्णत्वास नेले आहे.आणखी 50 हजार घरकुले येणाऱ्या दिवाळी पर्यत पूर्ण करायचे आहेत. या पार्श्वभूमीवर आजची ही जिल्ह्यातील पहिली कार्यशाळा आपण आयोजित केली आहे. या दिवाळीपर्यंत येणाऱ्या दिवाळीपर्यंत जो लाभार्थी घरकुलाचे अतिशय उत्कृष्ट असे काम करेल त्या लाभार्थ्याच्या घरी आमदार सुरेश धस व मी स्वतः फराळासाठी येईल. आपण जी आज प्रतिज्ञा घेतली आहे त्या प्रतिज्ञाप्रमाणे लाभार्थी यांनी घरकुलाचे काम दिवाळी पर्यंत पूर्ण पूर्णत्वास न्यावेत व ही येणारी दिवाळी नवीन घरात व्हावी अशी भावना जीवने यांनी यावेळी शेवटी बोलताना व्यक्त केली. यावेळी प्रकल्प संचालक संगीता पाटील म्हणाल्या,पहिली कार्यशाळा आष्टी तालुक्यात घेण्याचा मान मिळाला आहे.चांगली व दर्जेदार घरकुले बांधा,दिशा पाहून घरकुले बांधा.आपण सगळे मिळून दिवाळीचा पहिला दिवा लाभार्थी यांच्या नवीन घरात लावायचा आहे.
यावेळी आयोजित कार्यशाळेत मतदारसंघातील सरपंचांच्या समस्या जाणून घेत येणाऱ्या काळात सोडविण्ययाचे आश्वासन आ.धस यांनी दिले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन बाळासाहेब तळेकरसर यांनी केले तर आभार पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बाळासाहेब जायभाये यांनी मानले. यावेळी मतदार संघातील सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत अधिकारी, घरकुल विभाग अधिकारी व कर्मचारी, नरेगा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचेसह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected