संगणक हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक असल्याने संगणक साक्षर होणे ही काळाची गरज -गटशिक्षणाधिकारी यादव
आष्टी /प्रतिनिधी
संगणक हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक असून संगणक साक्षर होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आष्टी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव यांनी आष्टी येथील मदरसा इस्लामिया दारुल उलूम, जामा मस्जिद,मोगलपुरा च्या संगणक कक्षाच्या उद्घाटनाप्रसंगी केले.
आष्टी येथील जामा मजीद येथील परिसरात सुरू असलेल्या या दारुल-उलूम येथे विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्यासाठी सामाज बांधवांच्या सहभागातून सुसज्ज असलेल्या संगणकाच्या उद्घाटन गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव यांच्या हस्ते झाले यावेळी या कार्यक्रमास आष्टी नगरपंचायत चे नगराध्यक्ष मिर्झा झिया बेग, माजी शिक्षण सभापती नियामत बेग, गुलाम हाफिज, मौलाना उमर यांच्यासह सर्व स्तरातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना सुधाकर यादव म्हणाले की 1985 साली नव्यानेच आलेल्या संगणकाचा आकार मोठा होता त्याला फार मोठी जागा लागत होती मात्र आज 2024 मध्ये टेबलावरचा संगणक हातात च्या स्मार्ट वॉच मध्ये परिवर्तित झाला असून ही संगणकाच्या युगात झालेली मोठी क्रांती आहे. काळा बरोबर विद्यार्थ्यांनी संगणक साक्षर होऊन स्वतःसोबत समाजाचा आणि देशाचा विकासामध्ये हातभार लावण्यासाठी प्रयत्न करावा व संगणक साक्षर व्हावे असे त्यांनी यावेळी सांगितले.सध्याच्या काळात संगणक हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक आवश्यक घटक आहे. याचा अर्थ असा की संगणक व्यावहारिकपणे प्रत्येक उद्योगात वापरला जातो, जो आपल्या दैनंदिन कार्यांना सुलभ करतो आणि वेगवान करतो. आज , आपली घरे, बँका, दुकाने, शाळा, रुग्णालये आणि रेल्वे यासह विविध ठिकाणी संगणक वापरले जातात यामुळे संगणक साक्षर होणे काळाची गरज आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी गट शिक्षण कार्यालयाचे शालेय पोषण आहाराचे प्रमुख शिवाजी आव्हाड ,शेख जुनेद, मनोज यादव यांच्यासह संजय भोकरे, पोले सर ,बनकर सर ,शिंदे सर, आजबे सर, विश्वकर्मा सर, शेख मुजाहिद इंजिनियर यांच्यासह समाजातील सर्व मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी संगणक कक्षाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करून पाहणी करण्यात आली विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या या उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. यावेळी मोठी संख्येने विद्यार्थ्यांसह पालक यांची उपस्थिती होती.
stay connected