कांदा पिकाला पाणी मोजून द्यावे ! - संदीप घोले सर

 कांदा पिकाला पाणी मोजून द्यावे ! - संदीप घोले सर 





      आष्टी प्रतिनिधी -

      कांद्याचे पीक हे कमी पाण्यावर येणारे पीक आहे. कांद्याला पाणी देताना मोजून पाणी द्यावे. असे मत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शेतकरी संदीप घोले यांनी बेलगाव येथे व्यक्त केले. कांदा पिक परिसंवादामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून शनिवारी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच तात्यासाहेब शिंदे हे होते. 

      यावेळी त्यांनी कांदा बियाणे कसे तयार करावे, कांदा रोप तयार करणे व कांदा लागवड या विषयी माहिती दिली. तसेच कांद्याला कोणते खते द्यावीत. खताची मात्रा केव्हा आणि कशी द्यावी. कांद्यावरील किडीचे नियंत्रण कसे करावे? आणि वखारी मध्ये कांदा साठवणुकीचे तंत्र याबाबतचे सविस्तर माहिती त्यांनी यावेळी गावकऱ्यांना दिली.

       बेलगाव मधील शेतकरी आजही पारंपारिक पद्धतीने शेती करतात.उडीद ,मूग ,तूर ,बाजरी, ज्वारी आधी पारंपारिक पिके येथील गावकरी घेतात. काही प्रमाणात उसाचे पीक सुद्धा पारंपारिक पद्धतीने घेतले जाते. गावामध्ये कार्यारत असलेले एकही शेततळे नाही. त्यामुळे पिकांसाठी पाण्याचा वापर अवास्तव होतो.

         शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक शिबिरे, पीक परिसंवाद, शेतीसाठी पाणी वापर कसा करावा याबाबत तज्ञांचे मार्गदर्शन वेळोवेळी आयोजित करण्याचा मनोदय सरपंच तात्यासाहेब शिंदे यांनी बोलून दाखवलां.

      यावेळी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी सतीश नवनाथ पोकळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.