बदलापूर प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याचे गृहमंत्र्याने राजीनामा द्यावा:भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांची मागणी

 बदलापूर प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याचे गृहमंत्र्याने राजीनामा द्यावा:भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांची मागणी



बलात्काऱ्यांना फाशी द्या.. महाराष्ट्रामध्ये जे बाल अत्याचार होत आहे याची नैतीक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्रीने राजीनामा द्यावा बदलापूर घटनेची सकल चौकशी व्हावी गुन्हा नोंदवण्यास दिरंगाई केलेल्या पोलिसांची चौकशी होऊन जे कसूरवार पोलीस आहे त्यांना सेवेतून बडतर्फ करावे संपूर्ण भारतामध्ये जे ड्रायव्हर विद्यार्थी वाहतूक करतात त्यांचे वर्तनिकेचे दाखले पोलिसांनी तपासले पाहिजे पोलीस यंत्रणेमार्फत किमान तीन महिन्यातून एकदा संपूर्ण भारतामध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शिपाई व ड्रायव्हर यांची संयुक्त पोलीस स्टेशनमध्ये बैठका घेणे व विद्यार्थ्यांनी व विद्यार्थ्यांच्या संरक्षणासंदर्भात त्यांना सूचना देणे.आरोपीला जलद गती न्यायालयाचे उभे करून लवकरात लवकर फासावर लटकवणे याकरिता चांगल्या वकिलाचे नेमणूक करणे सहा महिन्याच्या आत आरोपीला फाशी होईल याची सरकारने तरतूद करणे जेणेकरून गुन्हेगारीला आळा बसून.शालेय मुली व मुलांनवर आत्याचार कमी होऊन त्यांना संरक्षण मिळेल यासह अनेक सूचनाचे निवेदन मिरज शहर dysp मार्फत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आलेले आहे 

यावेळी भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख यांच्या नेतृत्वाखाली मिरज शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांना निवेदन देण्यात आले आणि जनतेमधील असलेला रोष व चीड संदर्भात माहितीही देण्यात आली.यावेळी पोलीस निरीक्षकाने आपले निवेदन पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू असे आश्वासन निवेदन स्वीकारताना दिले 

यावेळी भीम आर्मीचे सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख,साद गवंडी,शिराज शिकारी,हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख,शाबाज सय्यद,ताहीर कनवाडे,मोहम्मदहनिफ मुजावर,रशीद पठाण,जैन सय्यद ,शोहेब कनवाडे शाहिद अल्ली सहित भीम आर्मीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.