आष्टीत रामगिरी महाराजावर गुन्हा दाखल : लवकर अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी
-------------------
आष्टी (प्रतिनिधी) - मुस्लिम समाजबाबत वादग्रस्त वक्तव्य करून समाजात अशांतता पसरविण्याचे प्रकरण दिवसेंदिवस वाढत आहेत. स्वतःला धर्माचा ठेकेदार म्हणून घेणाऱ्या व्यक्तीकडूनच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात असल्याने पोलीस प्रशासनाचा वचक संपत आहे की काय असा प्रश्न अल्पसंख्याक समाजाला पडला आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात मुस्लिम धर्म व धर्मगुरू यांच्याबद्दल वारंवार अपमानकारक वक्तव्य करून समाजाच्या भावना दुखावण्याचे काम काही जातीयवादी शक्ती करत आहेत. याचाच एक प्रयोग नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात घडला आहे. एका सप्ताह दरम्यान रामगीरी गुरु नारायण गिरी महाराज याने मुस्लिम धर्माचे महान धर्मगुरू प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या चारित्र्यावर वादग्रस्त वक्तव्य करून दोन धर्मांमध्ये जातीय द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रामगिरी यांच्यावर नगरसेवक नाजीम शेख यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, रामगीरी गुरु नारायण गिरी महाराज सरला बेट यांनी मौजे पंचाळे,ता.सिन्नर,जि. नाशिक या ठिकाणी सप्ताहा दरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदायासमोर मुस्लिम धर्माची व धर्मगुरुची प्रतिमा मलीन होईल असे जाणिवपूर्वक प्रवचन केले होते. यामध्ये बोलताना ते म्हणाले की, भारतात एक कोटीपेक्षा अधिक मुस्लिमांनी इस्लाम सोडला आहे. दहा-वीस वर्षे ज्यांनी मौलाना म्हणून काम केले त्यांनी ही इस्लामचा सुक्ष्म अभ्यास केला असता त्यांना यात अन्याय व अत्याचारा शिवाय काहीही आढळून न आल्याने त्यांनी इस्लाम धर्म सोडून दिला आहे. मोहम्मंद पैगबर यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी सहा वर्षांच्या मुलीसोबत विवाह केला. ज्यांचे आदर्शच अत्याचारी आहेत त्यांच्याबाबत अजून काय सांगायचे? अशा स्वरुपात त्या प्रवचनामध्ये मुस्लिम धर्मियांबाबत मोठ्या प्रमाणावर अनेक वक्तव्ये रामगीरी गुरू यांनी केली आहेत. या वक्तव्यामुळे हिंदू-मुस्लिम समाजांची मने कलुषित करुन जातीय तणाव व धार्मिक द्वेष पसरविण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी अशा भामट्या रामगीरी महाराजाकडून जाणुनबुजुन धार्मिक भावना दुखवुन जातीय दंगल घडविण्याच्या इराद्यात व्यक्तव्य करुन घेण्यात येत असल्याचा संशय येत आहे. रामगिरी यांचा बोलविता धनी कोण आहे हे संपूर्ण राज्यातील जनतेला माहिती आहे. यामुळे रामगीरी याने केलेल्या वक्तव्यामुळे समाज जीवनातील एकोपा, सामाजिक बंधूभाव धोक्यात येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. सध्या गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे. पाठोपाठ महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे. यामुळे अशा समाजघातकी बनावट साधूला तात्काळ अटक करून कडक शासन करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
stay connected