जिनके घर शीशे के बने होते है,वो दुसरो के घरो पर पत्थर नहीं फेका करते अशी म्हणायची वेळ आली - अ‍ॅड.प्रदीप चव्हाण

 *जिनके घर शीशे के बने होते है,वो दुसरो के घरो पर पत्थर नहीं फेका करते अशी म्हणायची वेळ आली - अ‍ॅड.प्रदीप चव्हाण*

------------------------




आष्टी (प्रतिनिधी) - गुन्हा दाखल झाला म्हणजे सगळं काही संपलं असं नाही रामगिरी गुरू या भोंदू बाबाला तात्काळ अटक करून त्याला कठोर शासन करा जेणेकरून राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याची मजल येथून पुढे कोणाची होणार नाही अशी मागणी करत समाजात प्रबोधन व सुधार करायचा असेल तर स्वतःच्या हिंदू धर्मापासून सुरू करावा इतर धर्म व धर्मगुरू बाबत वादग्रस्त वक्तव्य करून काय साध्य करायचं आहे असा प्रश्न रयत सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.प्रदीप चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. 



                 रामगिरी गुरु हा व्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित असून त्याचे विचार देखील मनुवादी आहेत. सहा सोनेरी पाने वाचणाऱ्या कडून हीच अपेक्षा केली जाऊ शकते. सत्तेतील सरकार युतीचं असून रिमोट कंट्रोल मात्र रेशीम बागेत आहे असे चव्हाण म्हणाले. सप्ताहमध्ये प्रवचन करताना हिंदू धर्मातील साधू, संत व पुराणाबाबत भक्तांना माहिती द्यावी जेणेकरून त्यांच्या ज्ञानात भर पडेल. परंतु असे न करता काही समाजविघातक व स्वयंघोषित महाराज यांच्याकडून इतर धर्माबद्दल वादग्रस्त व बेताल वक्तव्य केली जात आहेत. असे बोलणाऱ्या व्यक्तीला कोणाचा आधार आहे व याच्यातून त्याला काय साध्य करायचं आहे हे सर्व जनतेला कळून चुकले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.



             स्वतःच्या घराशेजारील हिंदू धर्माच्या कुटुंबात महिलांवर होणारे अत्याचार थांबविण्यात अपयशी झालेल्यांनी इतर समाजाच्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर ज्ञान पाजळू नये असा खोचक सल्ला ही चव्हाण यांनी दिला. हिंदू धर्मातील महिलांचे घटस्फोट व पोटगी संदर्भात कोट्यवधी प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. वर्षानुवर्ष सुरू असलेल्या प्रकरणांमुळे हिंदू महिला व पुरुष गैरमार्गाने जीवन जगत आहे. यावर सुधारणा करण्याऐवजी तीन तलाक आणि मुस्लिम महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर बोलण्यासाठी मात्र हिंदू धर्माच्या ठेकेदारांकडे वेळ आहे. यामुळे जिनके घर शीशे के बने होते है वो दुसरो के घरो पर पत्थर नहीं फेका करते अशी म्हणायची वेळ आली असल्याचं चव्हाण म्हणाले.



           देश व राज्यातील जातीयवादी शक्तींनी  फक्त सत्ता मिळवण्यासाठी हिंदू जन आक्रोश मोर्चा, तीन तलाक, मराठा-ओबीसी वाद, विशाळगड प्रकरण आणि आता रामगिरी गुरु यांच्या वादग्रस्त वाक्तव्याच्या आडून राज्यात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचा कट रचून परत सत्ता कशी मिळवता येईल हा प्रयोग केला असल्याचा गंभीर आरोप यावेळी अ‍ॅड.प्रदीप चव्हाण यांनी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.