निवडणुकापुरतेच लोकांत जाणाऱ्यांना जनता माफ करणार नाही
------जयदत्त धस
**********************************
जयदत्त धस यांनी युवा संवाद दौऱ्यात संपूर्ण मतदारसंघ काढला पिंजून
********************************
********************************
आष्टी (प्रतिनिधी)
निवडणुका येतात जातात परंतु जनसामान्यापर्यंत आपण चांगले संपर्क ठेवले पाहिजेत निवडणुकीपुरतेच लोकात जाणं हे जनता माफ करत नाही परंतु आमचं धस कुटुंबीय प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जातात म्हणून जनता हे आम्हाला विसरत नाही असे मत आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे युवा नेतृत्व जयदत्त भैय्या धस यांनी व्यक्त केले घाटा पिंपरी येथे युवा संवादक दौरा आयोजित केला होता त्यावेळेस गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले पुढे बोलताना ते म्हणाले की ज्यांना पिक विमा मिळाला नाही त्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तकार अर्ज दाखल करावेत या तक्रारीचा निरंकारण करण्यासाठी मी सदैव तत्पर राहील असे ते म्हणाले यावेळी गावातील छोटे-मोठे विविध प्रश्नावर माजी सरपंच गोवर्धनतळेकर व विनायक मुळीक यांनी गावातील समस्या सांगून त्याबाबत काही उपाय योजना करण्यात येत असेल तर करा असेही त्यांना सांगितले घाटा येथील ग्रामस्थांच्या वतीने पुष्पहार व फटाक्याचे आतषबाजी करत त्यांची जंगी स्वागत केले या कार्यक्रमाला सरपंच प्रल्हाद मुळीक धामणगाव शामा आबा तळेकर कडा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सरपंच मनोजशेठ गाढवे माजी उपसरपंच सदाशिव घुमरे माजी सरपंच गोवर्धन तळेकर माजी उपसरपंच अमोल तळेकर ज्येष्ठ नेते विनायक भाऊ मुळीक बाळासाहेब कांबळे अल्ताफ शेख अशोक बायकर रवी बायकर गोटीराम झांजे अशोक तळेकर व शाहु कोकरे सह मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार सुरेश कांबळे यांनी केली
stay connected