शेतकऱ्यांच्या पिकविमा भरपाईसाठी ई-पिक पाहणी जाचक अट रद्द करा - रवि काका ढोबळे पाटील
कडा ( प्रतिनिधी ) सर्व शेतकरी सुशिक्षीत नसुन अनेक शेतकरी हे अशिक्षीत आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांना अॅन्ड्राईड मोबाईल वापर करता येतो व काही अशिक्षीत शेतकऱ्यांना अॅन्ड्राईड मोबाईल वापरता येत नाही. शेतकरी गरीब कुटूंबातील आहेत. त्यांच्याकडे अॅन्ड्राईड मोबाईल नसल्यामुळे ई-पीक पाहणी करता येत नाही. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना पिकविमा मिळण्यापासुन ते वंचित राहत आहेत. पिकविमा ही योजना शासनाची असुन त्यांच्या फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना होत नाही. खरीप अनुदानासाठी शेतकऱ्यांची पोर्टल नोंदणी नसल्यामुळे लाखो शेतकरी विम्या पासुनवंचित राहीलेले आहेत.
तरी शासनाने ही जाचक अट शिथील करून शेतकऱ्यांना पिकविम्याचा मोबदला द्यावा अशी मागणी भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे आष्टी तालुका अध्यक्ष रवि ढोबळे यांनी जिल्हाधिकारी बीड यांना निवेदनाद्वारे केली आहे .
stay connected