कड्यात डासांचा प्रादुर्भाव वाढला; दवाखाने झाले हाऊसफुल -------------------------- ग्रामपंचायत व आरोग्य प्रशासनाने खबरदारी घेण्याची गरज

 कड्यात डासांचा प्रादुर्भाव वाढला; दवाखाने झाले हाऊसफुल
--------------------------
ग्रामपंचायत व आरोग्य प्रशासनाने खबरदारी घेण्याची गरज



------------------

राजेेंद्र जैन / कडा

---------------------

सततचे ढगाळ वातावरण, अधूनमधून रिमझिम पावसाच्या कोसळणा-या सरी आणि डासांचा वाडता प्रादुर्भाव यामुळे सध्या कडा परिसरात सर्दी, खोकला, हिवताप, निमुनिया, चिकुनगुनिया यासारख्या साथीच्या आजाराने त्रस्त रुग्ण संख्येत वाढ होऊ लागल्याने दवाखाने हाऊसफुल्ल होऊ झाले असून,

ग्रामपंचायत व आरोग्य प्रशासनाने तातडीने डास प्रतिबंधक उपाययोजना करण्याची मागणी नागरीकांतून होत आहे.


मागील महिनाभरापासून सतत पाऊस पडत असल्यानमुळे सखल भागात पाणी साचून परिसरात गवत वाढले आहे. या साचलेल्या पाण्याच्या डबक्यामुळे डासांचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तर अस्वच्छ पाण्याची डबके डासांची उत्पत्ती केंद्र बनली आहेत. त्यामुळे कडा परिसरात सर्दी, खोकला, हिवताप, निमुनिया, चिकुनगुनिया यासारख्या साथीच्या आजाराने डोके वर काढले असून, शहरात घरोघरी सर्दी, खोकला, हिवतापाचे रुग्ण आढळून येत आहेत. यामध्ये लहाण मुलांचे व वृध्दांचे प्रमाण अधिक दिसून येते. सरकारी व खाजगी दवाखाने हाऊसफुल्ल होऊ झाले आहेत. रुग्णांनी वेळीच वैद्यकीय सल्ला घेतला नाही तर व्हायरल इन्फेक्शनमुळे गोचीड ताप, डेंगू, चिकुनगुनिया, निमुनिया, टाईफाॅईड, या आजारात रुपांतर होण्यास वेळ लागणार नाही. असे वैद्यकीय तज्ञाचे म्हणणे आहे. पावसाळ्यातील साथीच्या आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी ग्रामपंचायत व आरोग्य प्रशासनाने तातडीने खबरदारी घेऊन डास निर्मुलन प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी धूर फवारणी करण्याची मागणी नागरीकांतून होत आहे.

--------%-----------

प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात
-----------------
पावसाळ्यात डासांचा वाढता प्रादुर्भाव व वातावरणातील बदल यामुळे हिवताप, सर्दी, खोकला, चिकुनगुनिया, गोचीड ताप यासारख्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. सरकारी व खाजगी दवाखाने हाऊसफुल झाल्याने ग्रामपंचायत कार्यालय व आरोग्य विभागाने संयुक्तपणे खबरदारी घेऊन धूर फवारणी करून डासांची उत्पत्ती ठिकाणे नष्ट करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

---------%%-------


रुग्णांनी वेळीच काळजी घ्यावी
--------------------
पावसाळ्यात वातावरणातील बदल व डासांचा प्रादुर्भाव, या कारणामुळे सर्दी, खोकला, हिवताप यासारखे साथीचे आजार वाढत असतात. साथजन्य आजार टाळण्यासाठी नागरीकांनी मास्क वापरावे, दिवसातून चार ते पाच लिटर कोमट पाणी प्यावे, मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात, प्रोटीनयुक्त सकस आहार, फळे खावीत व आराम करावा. तसेच साथीच्या आजाराची लक्षणे आढळून आल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.
-डाॅ.संदीप टेकाडे, कडा
( एमबीबीएस एफसीपीएस मेडिसिन व आयसीयू तज्ञ )
-----%%%----------




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.