झाडे लावणे आणि ती जगवणे हे राष्ट्रीय कर्तव्यच मानलं पाहिजे- डाॅ.विलासराव सोनवणे

 झाडे लावणे आणि ती जगवणे हे राष्ट्रीय कर्तव्यच मानलं पाहिजे- डाॅ.विलासराव सोनवणे

********************************

आष्टी नागरी पतसंस्थेच्यावतीने अध्यक्ष डाॅ. सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप

******************************



******************************

आष्टी(प्रतिनिधी)-

सध्या तालुक्यात आणि शहरात झाडांची संख्या त्या तुलनेत कमी आहे. त्यामागे अनेक कारणे असल्याचे लक्षात येते.पण केवळ कारणे शोधून त्यामध्येच अडकून पडण्यापेक्षा वृक्षारोपणावर भर दिला पाहिजे.कारण झाडे जगली तरच आरोग्य,पर्यावरण संतुलित राहणार आहे.खरे तर झाडे लावणे आणि ती जगवणे हे राष्ट्रीय कर्तव्यचं मानलं पाहिजे.त्यादृष्टीने प्रत्येक नागरिकाचा मनापासून सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ.विलास सोनवणे यांनी केले.

          आष्टी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ.विलासराव सोनवणे यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून बेलगांव ग्रामस्थ व आष्टी नागरी पतसंस्थेच्यावतीने रेणूकामाता मंदिर परिसरात वड,पिंपळ,गुलमोहर यासह अनेक १०१ वृक्षाचे वृक्षारोपण शनिवार दि.२३ रोजी सकाळी १० वा.करण्यात आले.तर बेलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच अंबिका विद्यालयातील १२० विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड व पेन वाटप करण्यात आले असा समाज उपयोगी उपक्रम राबवत डॉ. विलासराव सोनवणे यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी म्हणून साजरा करण्यात आला.

       व्यासपीठावर अॅड.निर्मला सोनवणे, पतसंस्थेचे उपाध्यक्ष नवनीत कटारिया,माजी शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे,डॉ.प्रकाश झांजे,बेलगांव सरपंच तात्यासाहेब शिंदे, अंबिका विद्यालयाचे मुख्याध्यापक जेवे,आष्टी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण पोकळे, डॉ.नदिम शेख,माजी सरपंच बन्सीभाऊ पोकळे,युवा नेते अशोक पोकळे,उपसरपंच सतीश पोकळे,मसिताराम पोकळे,जेष्ठ पत्रकार भिमराव गुरव,पत्रकार सचिन रानडे, गणेश दळवी,ईश्वर पोकळे,माजी उपसरपंच संजय पोकळे,कैलास पोकळे, अमृत पोकळे, पतसंस्थेचे शाखाधिकारी काकासाहेब पोकळे,प्रशांत पोकळे,आनंद शेलार,काकडे आदि मान्यवर उपस्थित होते.




       पुढे बोलतांना डॉ.सोनवणे म्हणाले,

अन्न,वस्त्र,निवारा या मूलभूत गरजा प्रमाणेच ऑक्सिजनची देखील तेवढी गरज आहे.

झाडांमुळे घर,बंगल्याचे सौंदर्य खुलते.एक प्रकारचा टवटवीतपणा जाणवतो. हीच बाब शहरासाठीही लागू आहे. ज्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे असतात तेथील नागरिकांच्या चेह-यावर तजेलदारपणा असतो.युरोपमधील अनेक शहरांत वृक्षारोपणावर विशेष लक्ष दिले जाते.त्याचे कारणच तेथील नागरिकांमधील जागरुकता हे असावे.भारतात अलीकडील काळात वृक्षारोपणाविषयी जागरुकता निर्माण झाली आहे.पण त्याचे प्रमाण अपेक्षे एवढे नाही. म्हणूनच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त होणा-या मोहिमांचा अपेक्षित फायदा होत नाही.हे लक्षात घेऊन नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे तरच झाडे जगतील. बेलगाव ग्रामस्थांनी माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून  वृक्षारोपण आणि कौतुक सन्मान केला तसेच १९८३ पासून या बेलगावाने मला खूप दिल आहे. माझ्या डॉक्टर म्हणून जनसेवेची सुरुवातच मी बेलगाव या गावातून केली आहे आणि या गावाने मला भरभरून दिलं आहे. अतिशय जिव्हाळ्याचे संबंध या गावाशी माझे सुरवातीच्या काळापासून राहिले आहेत.माझा वाढदिवस ग्रामस्थांनी साजरा केला असल्याने मनाला समाधान लाभले आहे असेही त्यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे शाखाधिकारी काकासाहेब पोकळे यांची कन्या विद्यार्थी कु.अंकिता हिने आष्टी नागरी पतसंस्थेबद्दल माहिती आणि डॉ. सोनवणे यांच्या जीवन कार्याबद्दल अतिशय मुद्देसुदपणे प्रभावी मनोगत व्यक्त करत उपस्थितांचे मन जिंकले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपक शिंदे यांनी केले तर आभार सिताराम पोकळे यांनी मानले.याप्रसंगी  आष्टी नागरी पतसंस्थेचे कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी, ग्रामस्थ आदि मान्यवर उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.