महाराष्ट्र राज्याची ओळख वारकरी संप्रदायाने होते, सत्तेत नसलो तरी सर्व सामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध - मा. आ. भिमराव धोंडे

 महाराष्ट्र राज्याची ओळख वारकरी संप्रदायाने होते,   सत्तेत नसलो तरी सर्व सामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध - मा. आ. भिमराव धोंडे 




 आष्टी प्रतिनिधी 



महाराष्ट्र राज्याची ओळखच वारकरी संप्रदायाने होते.वारकरी  संप्रदायाने समाज घडविण्याचे काम केले. समाजाला चांगली शिकवण दिली असे प्रतिपादन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले.

शिरूर तालुक्यातील पिंपळनेर परिसरातील गावे व वाड्या वस्त्यांचा दौरा केला त्याप्रसंगी खरमाटवाडी , जेधेवाडी, उखळवाडी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास भेट दिली त्यावेळी मा आ भिमराव धोंडे बोलत होते.

      आष्टी विधानसभा मतदारसंघातील सर्व सामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माजी आ. भीमराव धोंडे यांनी  जनसंपर्क अभियाना अंतर्गत रविवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी शिरूर तालुक्यातील पिंपळनेर परिसरातील वारे वस्ती, खोपटी, खरमाटवाडी, सुळवस्ती, खंडोबा वस्ती, जाटनांदूर,जेधेवाडी, भिल्लारवाडी, उखळवाडी, चाहुरवाडी, वडाळी, पिंपळनेर येथील फुलमाळी वस्ती , गुंडाळे वस्ती, पिंपळनेर, वडाची वाडी, रामगिरवाडी, भडकेल या गावांचा दौरा केला.  दौऱ्याच्या निमित्ताने माजी आ. भीमराव धोंडे यांचे ठिकठिकाणी जोरदार वाजतगाजत व तोफा वाजवुन  स्वागत  करण्यात आले.

दौऱ्याच्या निमित्ताने मा. आ. भिमराव धोंडे यांच्या सोबत भा. ज. प. युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजयदादा धोंडे, माजी जि. प. सदस्य रामदास बडे, माजी सभापती बाबुराव केदार, युवा नेते अशोक खोले , युवा नेते माऊली पानसंबळ, एम. एन. बडे, चेअरमन आजिनाथ गवळी, माजी सभापती अनिल जायभाय, संजय कांकरिया, संतोष गोल्हार, माजी सरपंच राजु वारे, युवराज खरमाटे व इतर उपस्थित होते. 

       पुढे बोलताना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की, मी आमदार असताना शिरूर तालुक्याचा रस्ते तसेच इतर मोठा विकास केला आहे, भविष्यात उर्वरित विकास करण्यात येईल,  तसेच मी सत्तेत नसलो तरी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. जाटनांदूर येथे रेल्वे स्टेशन करण्यासाठी मी रेल्वे मंत्र्यांना भेटणार असल्याचे धोंडे यांनी सांगितले. 

   ह.भ.प. राम महाराज डोंगर यांनी  सांगितले की, माजी आमदार भीमराव धोंडे यांनी कधीच कोणाला त्रास दिला  नाही, शांत, संयमी  व सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालणारे असे व्यक्तीमत्व आहेत . सर्वस्तरीय समाजाला प्रेम देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे भिमराव धोंडे आहेत. युवा नेते किशोर खोले यांनी सांगितले की,भिमराव धोंडे आमदार असतानाच शिरूर तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे झाली. आता ही विकासासाठी भिमराव धोंडे यांची  मतदारसंघाला गरज आहे. वेदांत खेडकर व सिद्धांत खेडकर या दोन मुलांनी बुद्धीमत्ता परिक्षेत यश संपादन केल्याबद्दल दोघांचा सत्कार मा. आ. भिमराव धोंडे यांच्या हस्ते करण्यात आला. 

ठिकठिकाणी झालेल्या बैठकीत  माजी जि. प. सदस्य रामदास बडे, चेअरमन भागवत खरमाटे, मोहन शिंदे, चेअरमन आजिनाथ गवळी, राजेंद्र वारे, युवराज खरमाटे, हभप राम महाराज डोंगर, माऊली पानसंबळ, किशोर खोले,संतोष गोल्हार यांची भाषणे झाली.

मोरजळवाडी येथे रेणुका माता व पिंपळनेर  येथील श्री क्षेत्र इंदुवासिनी देवीचे दर्शन घेतले. आचार्य स्वामी त्रिवेंद्रानंद सरस्वती महाराज व आचार्य स्वामी कृष्णा महाराज यांनी भिमराव धोंडे यांचे स्वागत केले तसेच पिंपळनेर येथील संत वामन भाऊ, संत भगवानबाबा व लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. 

दौऱ्याच्या निमित्ताने राजु वारे, फौजी बापूराव शिंदे, डॉ. शरद जायभाय, बबनराव जायभाय यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या. दौऱ्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बैठकीस उपसरपंच जानु सुळ, चेअरमन भागवत खरमटे, वसंत भाऊ जायभाय, मधुकर जायभाय, म्हस्के फौजी, बाळासाहेब पवार, सरपंच मिठ्ठूदादा जायभाय, माजी सरपंच राजु वारे, सोमनाथ वारे, महादेव शिंदे, सिताराम वारे, यशवंत वारे, कारभारी वारे, रमेश सिरसाठ, हनुमंत खरमाटे, रणजित सुळ, जयसिंग खेडकर, इंदुआक्का गोल्हार, ह.भ.प. सविताताई महाराज, रासपचे शाम महारनवर, शंकरराव जायभाय, राजकुमार पालवे, डॉ. शरद जायभाय, रणजित खरमाटे, बाबु सुळ, रावसाहेब जायभाय, रामभाऊ सिरसाट, कुंडलिक मोरे, पांडुरंग बारगजे, दादासाहेब बारगजे, विठ्ठल डोंगर,भास्कर खरमाटे, युवराज खरमाटे, नानासाहेब खरमाटे, सतिष सुळ, दिलीप जायभाय, सुर्यभान सुळ, बाळासाहेब डोंगर, बबन डोंगर, किसन डोंगर, शहादेव डोंगर, रावसाहेब वाल्हेकर, गणपत डोंगर, लक्ष्मण जेधे,  

वैभव बडे,भाऊसाहेब महाराज जेधे, महादेव जेधे, शहादेव जेधे, बाळासाहेब जेधे, भाऊसाहेब सरोदे, आनंदराव भिल्लारे, मारुती भिल्लारे, सतिष जाधव, गोरख भोसले, कृष्णा भोसले, मच्छिंद्रनाथ शिंदे, खंडू माने, जिवन शिंदे, तबाजी मुळे, नवनाथ मुळे, गजानन जाधव, बाबु खेंगरे, अरुण जाधव, गोवर्धन खेंगरे, सरपंच भाऊसाहेब गोरे,सयाजी खेंगरे,बाबु गुंडाळ, सयाजी फुलमाळी, चेअरमन संजय गोरे, भाऊसाहेब धनवडे, सुरेश गोरे उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.