उंदरखेल येथील शेतकऱ्याचा मुलगा झाला पोलीस ,आई-वडिलांच्या कष्टाचे केले चीज
आष्टी प्रतिनिधी-
तालुक्यातील उंदरखेड येथील शेतकरी सुभाष वामन यांचा मुलगा अजिंक्य वामन हा त्याचा मुलगा शालेय जीवनापासून हुशार होता आणि प्रयत्नांच्या परिकष्ठाने त्याला अखेर छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या पोलीस भरतीमध्ये मनोज दादा जरागे पाटील यांच्या प्रयत्नातून झालेल्या कुणबी छाननी मुळे तो पोलीस शिपाई म्हणून भरती झाला त्याला अखेर यश प्राप्त झाले आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुले,मुली विविध जिल्ह्यांत नुकत्याच निकाल जाहीर झालेल्या पोलीस भरतीत उत्तम यश संपादन करून पोलिस शिपाई पदी निवड होत आहे त्याच धर्तीवर आष्टी तालुक्यातील उंदरखेड येथील अजिंक्य वामण हा पण नूकतीच छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या पोलीस भरती मध्ये पोलिस शिपाई म्हणून भरती झाला आहे.त्याचा सत्कार माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी उंदरखेड येथे केला.त्याच्या या यशाबद्दल माजी सरपंच अंकुश वामन,आजिनाथ दहातोंडे. संजय पवार, बाबासाहेब वामन,किशोर वामन,अंबादास दहातोंडे चेअरमन, संदीप वामन,सुनील वामन, पांडुरंग वामन, सुभाष वामन,गणेश पवार व सर्व उंदरखेल ग्रामस्थ व परिसरातील गावातील ग्रामस्थांनी कौतुक करून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
stay connected