ऑगस्ट अखेर आष्टी- पाटोदा- शिरूर तालुके पिंजून काढणार :- मा. आ. भिमराव धोंडे

 ऑगस्ट अखेर आष्टी- पाटोदा- शिरूर तालुके पिंजून काढणार :- मा. आ. भिमराव धोंडे 





आष्टी प्रतिनिधी 



ऑगस्ट अखेर मतदार संघातील सर्व गावे, वाड्या वस्त्यांचा दौरा करीत  मतदारसंघ पिंजून काढू असे प्रतिपादन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी पाटोदा येथे कार्यकर्ता संवाद बैठकीत बोलताना केले केले. माजी.आ. भीमराव धोंडे यांनी शनिवारी  दिनांक १० ऑगस्ट रोजी जनसंपर्क अभियाना अंतर्गत पाटोदा तालुक्यातील नफरवाडी, पारगाव घुमरा, अनपटवाडी, पाचंग्री, मंझरी घाट, दासखेड, पाचेगाव, वाघेरा, वैद्यकिन्ही,भायाळा, बेनसुर, सावरगाव, सोनेगाव या गावाचा दौरा केला.  पाटोदा येथील महाविद्यालयात पाटोदा तालुका कार्यकर्ता संवाद बैठकीने दौऱ्याचा समारोप झाला. याठिकाणी लोकनेते गोपीनाथराव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

       आष्टी विधानसभा मतदारसंघातील सर्व सामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माजी आ. भीमराव धोंडे यांनी  पाटोदा तालुक्याचा दौरा केला. नागरिकांसोबत चर्चा करुन समस्या जाणून घेतल्या. दौऱ्याच्या निमित्ताने माजी आ. भीमराव धोंडे यांचे ठिकठिकाणी जोरदार वाजतगाजत व तोफा वाजवुन  स्वागत  करण्यात आले.

 भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजयदादा धोंडे, पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग नागरगोजे, संजय  कांकरिया, माजी सभापती महेंद्र नागरगोजे, माजी सभापती काकासाहेब लांबरुड, माजी सभापती अनिल जायभाय, बाळासाहेब पवार,अंकुश मुंढे व इतर कार्यकर्ते दौऱ्याच्या निमित्ताने उपस्थित होते. वेगवेगळ्या ठिकाणी बोलताना माजी आमदार भिमराव धोंडे  यांनी सांगितले की, सार्वजनिक कामांना मी नेहमीच प्राधान्य दिले आहे.  पैठण - पंढरपूर हा रस्ता तत्कालीन पालकमंत्री पंकजाताई मुंडे व तत्कालीन खा. प्रितमताई यांच्या मार्गदर्शनाखाली  मीच मंजुर करुन आणला होता. अनपटवाडी येथील जि. प. शाळेचे स्थलांतर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली त्यावर मा. आ. भिमराव धोंडे यांनी सांगितले की, भविष्यात हा प्रश्न मार्गी लावू,  अलीकडच्या काळात वेगवेगळ्या कामांत कमिशन घेत असल्याने कामाची गुणवत्ता खालावली आहे. आष्टी येथे २९ ऑगस्ट रोजी भव्यदिव्य असे कृषी प्रदर्शन भरविण्यात आले आहे याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. पाचेगाव येथील ग्रामस्थांनी केलेल्या रस्ता कामाची मागणी भविष्यात पुर्ण करु. भायाळा येथील राष्ट्र संत भगवान बाबा व वामनभाऊ महाराज तसेच दैवत गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचे  दर्शन घेतले.

ॲड. सुधीर घुमरे यांनी सांगितले की, भिमराव धोंडे हे शांत, संयमी नेतृत्व आहे. त्यांनी  पाटोदा तालुक्यात अनेक विकासकामे केली.  मराठा आरक्षण आंदोलन वेळी तहसील कार्यालयात येऊन त्यांनी पाठींबा दिला होता. मी सदैव आपल्या सोबत आहे असे घुमरे यांनी सांगितले. युवा नेते अजयदादा धोंडे यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर आपला पहिला हक्क आहे. मतदारसंघातील दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्वांनी युद्ध पातळीवर कामाला लागावे.

उपसभापती पांडुरंग नागरगोजे यांनी सांगितले की, पैठण -  पंढरपूर रस्त्यासह पाटोदा तालुक्यातील शेकडो रस्त्यांची कामे मा. आ. भिमराव धोंडे यांच्या  काळात झाली. मतदारसंघात सध्या टक्केवारीची कामे सुरू आहेत. सर्वसमावेशक चेहरा म्हणजे भिमराव धोंडे होय.भायाळा येथील सचिन बांगर यांनी बैलगाडा शर्यत जिंकुन १ लाख रुपये जिंकले त्याबद्दल व लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अशोक दैवान बांगर याने यश संपादन केले त्याबद्दल पालक दैवान  यांचा भिमराव धोंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 पारगाव घुमरा येथील साठे नगरला भेट देऊन साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ठिकठिकाणी माजी सभापती अनिल जायभाय, डॉ. नरेंद्र जावळे, बाळासाहेब पवार,राजपाल शेंडगे, देविदास शेंडगे, गंभीर उगलमुगले,  गोपिनाथ फौजी, धिरज पवार, नंदकुमार भोसले, सलीमभाई चाऊस, अंकुश मुंढे, बाळासाहेब लांडगे,  ग्रामपंचायत सदस्य अशोक म्हस्के, भाऊसाहेब शिंदे, नारायण नागरगोजे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

दौऱ्याच्या निमित्ताने मा. आ. भिमराव धोंडे यांनी नंदकुमार भोसले, विक्रमदादा घुमरे, अमोल कोकाटे, सरपंच भाऊसाहेब भराटे, जयसिंग भराटे, भाऊसाहेब शिंदे, मनोहरआबा बांगर, अनिल तनपुरे, भरत नाईकनवरे, भाऊसाहेब चवरे, सर्जेराव गर्जे यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या.

पारगाव येथील कै. दिनकरराव नागरगोजे यांच्या निधनामुळे  तसेच मंझरी घाट येथील कै. शिवाजी नांदे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. ठिकठिकाणी झालेल्या छोटेखानी बैठकीस सरपंच कृष्णा बांगर, उपसरपंच दत्ता बांगर, माऊली तांबे, बंटी तांबे, हनुमंत भोसले, गणेश गाडेकर, भिकु सेठ वीर, , महालिंग जायभाय, दादा वीर मुकादम, ईश्वर भोसले, सुनिल बडे, संपत बप्पा जायभाय, चंद्रभान बोराटे, श्रीकांत स्वामी, गौतम पालवे, शिवाजी गर्जे,  दिलीप कोल्हे, ज्ञानेश्वर बोधले, शाहुराज औटे, ऋषी कोल्हे, भाऊसाहेब शिंदे, सरपंच गणेश थोरात, उपसरप़ंच प्रताप गिरे, रवि गिरे,अमोल नाईकवाडे,,  बबन कोल्हे, मुन्ना सेठ, सुरेश कांबळे, तात्याबापु कोकाटे, भिमराव कोकाटे, साहेबराव कोकाटे, सरपंच नारायण नागरगोजे, बाळासाहेब लांडगे, नाना डोके, बाळासाहेब काळे, सुदर्शन खामकर, अशोक बांगर, अनिल बांगर, 

सखाराम बांगर, सोनबा बांगर, विनोद बांगर, मुरली पाखरे, जयवंत पाखरे,

बाबासाहेब बांगर, उपसरपंच गणेश आरसुळ, तात्यासाहेब आरसुळ, बंडू आरसुळ, माजी सरपंच विश्वनाथ बडे,पप्पु राख, बळीराम आघाव, किशोर राख, अशोक आरसुळ, बाबुराव आरसुळ, आजिनाथ घुमरे, डॉ. शंरद भोसले, अंकुश भोसले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.