अतिवृष्टीमुळे पाटोदा तालुक्यातील पिकांचे सरसकट पंचनामे करावेत.
------सुरेश धस
**************************
***********************
आष्टी ( प्रतिनिधी )
पाटोदा तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून संपूर्ण तालुक्यातील महसूल मंडळात अचानक पर्जन्याने आपले रौद्ररूप दाखवत शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केले. अस्मानी संकटाशी सामना करावा लागत आहे. परिस्थितीमुळे झालेल्या पिकांचे व नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी. अशी मागणी माजी मंत्री सुरेश धस यांनी केली आहे.
पाटोदा तालुक्यात शुक्रवार (१६ ऑगस्ट) रोजीपासून ढगफुटी सदृश्य पाऊस झाला.यामुळे खरिपातील, मुग, उडीद, तुर, बाजरी पिकांचे अतोनात नुकसान झाले.अनेक वर्षानंतर कडधान्य व तृणधान्य तसेच अन्नधान्याची सुगी चांगली होणार असल्याचे चित्र दिसुन येत असतानाच तीन चार दिवसापासून सततच्या झालेल्या पावसामुळे होत्याचं नव्हतं झालं,पावसामुळे पिके पाण्याखाली गेली, शेतजमीनी खरडून गेल्या. या आसमानी संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी योग्य ती कारवाई करावी अशी सुचना माजीमंत्री सुरेश धस यांनी तहिसलदार निलावाड यांना दिली आहे. नुकसानभरपाईसाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी मंत्री सुरेश घस यांनी सांगीतले.
stay connected