पिक विमा कंपनी व शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

 *पिक विमा कंपनी व शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट*


 

दौलावडगाव /.........

 २०२३ चा पिकविमा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला तो बोटावर मोजता येतील इतक्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची तक्रार ऑनलाईन केली होती अशाच तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले.जिल्ह्यात अनेक असे गावं आहेत की तिथे शेतकऱ्यांच्या शेतावर बांधावर मोबाईलला रेंज नसल्याने तर काही शेतकरी अडाणी असल्याने.त्याना ऑनलाईन तक्रारी करता आल्या नाहीत.तर  संदीप फसले, दत्ता फसले, रघुनाथ थोरात, कासम शेख,हामीदा शेख,सचिन कोहक, सागर कोहक ,शांताबाई कोहक, गहिनीनाथ राऊत, फकिरा कोहक, तुकाराम कोहक ,बाळासाहेब कोहक ,मंडाबाई कोहक ,लिंबराज कोहक सर्व रा.दौलावडगाव इत्यादी शेतकऱ्यांच्या तक्रारी असून यांना अद्याप विमा नुकसान भरपाई मिळाली नाही.विमा कंपनीने त्याची दखल घेऊन झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी.

बीड जिल्ह्यात सण २०२३ मध्ये सर्वत्र  दुष्काळजन्य परिस्थिती होती. उत्पन्नात मोठी घट झाली. त्यामुळे शेतीला खर्च झालेला देखील शेतकऱ्यांना शेतातून मिळाला नाही.कुठे पावसाच्या कमतरतेमुळे तर कुठं अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निघून गेला. शासनाकडून बीड जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आले असता.शेतकऱ्यांसाठी अनुदान व विमा कंपनीने पिकविमा जाहीर केला.पिक विमा कंपनीकडून अटी तटी व शर्तीच्या जाचक अटी पाई शेतकऱ्यांना सवतीच्या मुलाप्रमाणे वागणूक मिळत आहे.हा एक प्रकारे शेतकऱ्यांवर मोठा अन्यायच आहे.सरकार शेतकऱ्यांच नसून व्यापाऱ्यांच आहे काय? अशा प्रकारे संताप शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. एक दोन पिके समाविष्ट न करता सर्व पिके समाविष्ट करुन १००% विमा मिळाला पाहिजे अशाप्रकारची मागणी शेतकऱी वर्गातून होते आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.