बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान ; नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी - Bajarang Bappa Sonavane
------------------------------
बीड /प्रतिनिधी
विशवास राऊत
बीड जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे.त्यातच गुरूवारी दि.११ एप्रिल रोजी दुपारी अचानक वादळ-वारा व मेघगर्जने सह आलेल्या अवकाळी पाऊस व गारांच्या जोराच्या माऱ्याने शेतकऱ्यांच्या फळबागा, भाजीपाला व आंबा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे अवकाळी पावसा मुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी बजरंग सोनवणे यांनी केली आहे.
मागील पावसाळ्यात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप-रब्बी पिकांच्या उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे.सध्या पशूधनाच्या चारा-पाण्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.त्यातच मागील दोन-तीन दिवसां पासून अवकाळी पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले आहे.गुरुवारी दुपारी जोरदार वारा व मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या फळबागा,भाजीपाला व आंबा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.अगोदरच अर्थिक अडचणींवर मात करणाऱ्या शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीने कंबरडेच मोडले आहे. अवकाळी पावसाने झालेल्या शेतकऱ्यांच्या अर्थिक नुकसानीची माहिती प्रशासनाला फोनवरून कळविली आहे.त्यामुळे प्रशासनाने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अगोदरच दुष्काळी परिस्थितीने होरपळलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तथा महाविकास आघाडी चे बीड लोकसभा मतदार संघाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
stay connected