*७ वे पर्यावरण संमेलनाचे वनश्री पुरस्कार प्राप्त कोंढापुरी येथे हवामानतज्ञ पंजाबराव डख यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न*
---------------------
*निसर्ग व समाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे कार्य निश्चितच कौतुकास्पद व इतर पर्यावरण प्रेमीसाठी अनुकरणीय...*
--------------------------------
*सुप्रसिद्ध हवामानतज्ञ पंजाबराव डख यांच्या हस्ते निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळाचे राज्य प्रसिद्ध प्रमुख पत्रकार अण्णासाहेब साबळे यांचा विशेष सत्कार...!*
------------------------------- आष्टी(प्रतिनिधी) आर एम धारीवाल सिंहगड मॅनेजमेंट स्कुल निसर्गरम्य अशा वातावरणातील कोंढापुरी पुणे येथे दि.२३ डिसेंबर २०२३ रोजी अगदी उत्साहपूर्ण वातावरणात दोन दिवशीय निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे ७ वे पर्यावरण संमेलनाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध हवामानतज्ञ श्री.पंजाबराव डख तर प्रमुख पाहुणे श्री.पंकज देशमुख साहेब (आय पी एस अधिकारी),चांगुलपणाची चळवळ संस्थापक श्री.राज देशमुख साहेब,संस्थेचे अध्यक्ष श्री प्रमोददादा मोरे,सचिव सौ वनश्री गुणवरे ( मोरे ),वनश्री व ग्रामसमृद्ध पुरस्कारप्राप्त कोंढापुरी गावच्या सरपंच - सौ अपेक्षाताई गायकवाड ,कोंढापुरी सोसायटी मा चेअरमन,मा सरपंच श्री.स्वप्निलभैय्या गायकवाड , ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजयराव गायकवाड,उद्योजक श्री अशोकशेठ गायकवाड, सिंहगड संस्था कॅम्पस डायरेक्टर डॉ.अनिता माने,प्रसिद्ध देणगीदार श्री.आलीभाई दुलानी यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी प्रसिद्ध हवामानतज्ञ पंजाबराव डख यांनी बदलते व अनियमित हवामान,पर्जन्य यामुळे होणारी गारपीट,आवर्षणग्रस्त स्थिती तयार होण्याचे कारणे सांगताना कार्बन डायऑक्साइड चे वाढते चिंताजनक प्रमाण वाढते सिमेंट जंगल,भरमसाठ वृक्षतोड, जागतिक तापमानवाढ भयावह असून पर्यावरण संवर्धन करून वृक्ष लागवड व संवर्धन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असे आवर्जून सांगितले.तसे केले नाहीतर येणारा भविष्यकाळ अतिशय कठीण असेल.तसेच पशु ,पक्षी,खनिज पदार्थ आणि पाणी यासारखी नैसर्गिक साधनसंपत्ती जपून वापरणे ही काळाची गरज असेल.पाऊस नेमका किती व कधी होऊ शकेल याचा अचूक करण्याचे तंत्र सर्वांना समजावून सांगितले.तर श्री पंकज देशमुख साहेबांनी देखील आपल्याला लाभलेली नैसर्गिक संपत्तीचे जतन व्हावे. आपली भौतिक प्रगती साधताना निसर्गावर प्रेम करून पर्यावरण समृद्धी व जतन करावे.असा सल्ला दिला.मंडळाचे सल्लागार श्री राज देशमुख साहेब यांनी देखील विविध दाखले देत पर्यावरण महत्व पटवून दिले , मंडळाचे अध्यक्ष श्री प्रमोद मोरे यांनी संस्था अहवाल वाचन केले. तर प्रास्ताविक मंडळाचे सचिव श्रीमती वनश्रीताई गुणावरे यांनी केले.शब्द व सूत्रबद्ध संचालन श्री धीरज वाटेकर यांनी केले.या संमेलनास नगर, सातारा,सांगली,नाशिक, सोलापूर,चिपळूण,ठाणे,नदुरबार बीड,अशा २२ जिल्ह्यातून १९० निसर्ग व पर्यावरणप्रेमींनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला व उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.तसेच संस्थेने वर्षभरामध्ये राबवलेले विविध पर्यावरण व समाजिक उपक्रमांची अर्ध्या तासाची डोक्युमेंट्री दाखवण्यात आली.गेल्या वर्षामध्ये भरीव व दर्जेदार उपक्रम केलेले रत्नागिरी,हिंगोली व सांगली जिल्ह्यातील निसर्गप्रेमीना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले,त्यानंतर प्रसिद्ध डॉ प्रशांत नाईकवाडी यांनी आरोग्यवर्धक शेंद्रीय शेती या विषययावर,मा.श्री रणजित शानबान उपसंचालक विज्ञान आश्रम पाबळ यांनी विज्ञान पूरक पर्यावरण पूरक क्षेत्रातील व्यवसाय संधी या विषयावर तर डॉ सुनील भोईटे यांनी पर्यावरण संवर्धन व अध्यात्मिकता या विषयांवर व्याख्यान देऊन मार्गदर्शन केले.हे संमेलन यशस्वी होण्यासाठी मंडळाचे कार्याध्यक्ष श्री प्रमोद काकडे,छायाताई राजपूत- सचिव- (कार्य व नियोजन) श्री अनिल लोखंडे सर,पुणे जिल्हाध्यक्ष श्री मारुती कदम,नगरचे जिल्हाध्यक्ष तुकाराम अडसूळ,श्री प्रकाश केदारी,श्री सुभाष वाखारे,श्री भोजने सर,श्री गायकवाड सर, हरिदास शिंदे,श्री ढवळे सर,श्री.उत्तम पवार,सौ नलावडे मॅडम,सुहास गावित,लतिका पवार,स्वाती अहिरे आदिनी विशेष परिश्रम घेत ७ वे पर्यावरण संमेलन उद्घाटन कार्यक्रम यशस्वीपणे झाला.यावेळी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळाचे राज्य प्रसिद्ध प्रमुख पत्रकार अण्णासाहेब साबळे यांच्यासह काही निसर्ग प्रेमी पत्रकार बांधवाचे प्रसिद्ध हवामानतज्ञ श्री.पंजाबराव डख तर प्रमुख पाहुणे श्री.पंकज देशमुख साहेब (आय पी एस अधिकारी),चांगुलपणाची चळवळ संस्थापक श्री.राज देशमुख साहेब,संस्थेचे अध्यक्ष श्री प्रमोददादा मोरे,सचिव सौ वनश्री गुणवरे ( मोरे ) यांच्या हस्ते
विशेष सत्कार करण्यात आला. निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळ व उपस्थित होते यावेळी सर्व निसर्ग प्रेमींनी आनंद व्यक्त केला...
stay connected