नव्या वर्षाचा जल्लोश आणि आजची युवा पिढी Happy new year 2024
जुनं वर्ष संपणार नवीन सुरु होणार.युवा पिढीला आनंद वाटणार.सारा बदल आनंदाचा.आनंद साजरा करण्याचा.आनंदासाठी सर्व काही
माकडापासुन माणुस जन्मला असे चार्लस डार्वीनने आपल्या जगप्रसिद्ध ग्रंथात म्हटले.माणुस कसा उत्क्रांत होत गेला हेही सांगीतले.झाडावरील माकड जेव्हा झाडावरुन खाली उतरुन जमीनीवरुन चालु लागला तेव्हा त्याने स्वतःचा जीव रमविण्यासाठी करमणुकीची साधने शोधली.त्या करमणुकीच्या साधनांनी तो आपल्या जीवनात आनंद साठवु लागला.तो मनोरंजनाचा दृष्टिकोण रास्त मार्गाचा होता.
हा मनोरंजनात्मक दृष्टिकोण रास्त जरी असला तरी आज जे ३१ डिसेंबरला जे घडतं,तो बिभत्सपणा त्यात नव्हता.त्यामुळे मानवी मुल्याची जपणुक त्यात होती.करमणुक वेगवेगळ्या सणाप्रसंगी करण्याची योजना असायची.एखाद्या वेळी धान्याची रास घरात येत असतांना असा उत्सव साजरा केला जात असे.आबालवृद्धाच्या देखरेखीखाली असे कार्यक्रम होत असत.
इंग्रज भारतात आले.त्यांनी आपल्या प्रथा परंपरा भारतात आणल्या.त्यानुसार ते या भारतातील लोकांना वागवायला लागले.त्यांचे उत्सव त्यांच्या देशातील पर्यावरणाशी पुरक होते.त्यानुसार दारु पीणे.रोमान्स करणे या सा-या गोष्टी.कारण तेथील वातावरण तसे.पण भारतात मात्र तसे वातावरण नव्हते.नाही.पण भारतीयांना विचार करण्याची पाहिजे तेवढी बुद्धी नसल्याने यांनी आपल्या उत्सवप्रणालीत त्या इंग्रजांचे प्रकार अवलंबिले.त्यात ३१ डिसेंबर हा एक दिवस होय.
इंग्रज भारतात येण्यापुर्वी आबालवृद्धांना आपल्या मनोरंजनात सहभागी करुन घेणारी मंडळी ते भारतात आल्यावर वडिलधारी मंडळींना पार विसरुन गेली.व्हलेंनटाईन,फ्रेंडशिप डे हे उत्सव इंग्रजांचीच देण.मित्र बनविणे,त्याला दारु पाजणे,नव्हे तर प्रेमाचा इजहार करणे या सा-या गोष्टी इंग्रजांच्या.भारतात नव्हत्या त्या.हे प्रकार वाईटच.पण या प्रकाराने तमाम भारतीयांचे संस्कार तोडले.जोडीदार निवडीचे मायबापाचे स्वातंत्र्य याच परिवर्तनाने तोडले.
इंग्रज सुधारणावादी होते.खरे.त्यांनी सतीप्रथा,अस्पृश्यता,केशवेपण या प्रथा बंद केल्या.वाईट प्रथा होत्या .पण३१ डिसेबरला नाचणे.स्वतः दारु पिणे,मैत्रीणीला दारु पाजणे,थंड वातावरणात रोमान्स करणे ह्या तिकडच्या गोष्टी.पण भारतात ३१ डिसेंबरच्या नावाखाली जुन्या वर्षास निरोप देताना,नवीन वर्षाचे स्वागत करताना स्वतः दारु पिणे,मैत्रीणीला पाजणे,थंड वातावरणात मैत्रीणीची इच्छा नसतांना तिच्यावर बलात्कार करणे.पुढे तिला सोेडुन देवुन कुवा-यापणाचे गर्भारपणाचे भोग तिलाच भोगायला लावणे या सा-या गोष्टी ३१ डिसेंबरच्या उत्सवानिमित्याने घडायला लागल्या.
काय हा बिभत्सपणा?काय हा भोग?कुठे चाललाय भारत?इंग्रजांनी भारताला गुलाम करण्यासाठी वापरलेल्या सा-या गोष्टी.पण आपल्याला त्यातच मजा वाटते.आपल्याला कळतेय आपण काय करतोय ते.....तरीही आपण मुकाट्याने माहीत असुनही सगळं करतो.मित्र काय काय करणार हेही माहीत असते आपल्याला तरीही ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी त्याच्या बरोबर जातोच.त्याचे कवेत रोमान्सही करतो.दारुही पितो.अन् धोके मिळाल्यावर ओरडतो.याला जबाबदार कोण$मित्र जबाबदार की समाज की आपण?
मित्राने असे करु नये असे जर वाटते तर त्याच्यासोबत फिरायला का म्हणुन जावे?आपल्याला आपल्या भारतीय संस्कृतीची जाण नाही?आपण ही जाण ठेवु नये?मायबाप फिरायला जा म्हणुन सांगतात?नाही ना.....तरीही आपण जातो.कारण आपण स्वतःला तरुण समजतो.म्हातारे मायबाप का सांगतील आपल्याला?आपण त्यांना उल्लु समजतो ना.यातुनच ३१ डिसेंबरचा थरार........महाभयंकर थरार.एवढेच नाही तर दारु पिवुन गाड्या चालवितांना निरपराध रस्त्यावर झोपणा-या आभाळाची शाल करणा-या माणसाच्या अंगावर भरधाव गाड्या केव्हा चढतात.केव्हा आपला अपघात होतो ते कळत नाही.जेव्हा होश येते तेव्हा एखाद्या दवाखान्यातील अंथरुणावर थंडीने अकडलेले,हातापायाला बँडेस बांधलेली अवस्था दिसते.
सारं ३१ डिसेंबरमुळं आणि आपण आबालवृद्धांचं नाही ऐकल्यामुळं.पण तरीही सुधारल्यावर त्या गोष्टी विस्मरुन पुन्हा तेच ते.
केव्हा सोडणार या परकिय प्रथा?खरंच.या परकिय प्रथा नी आपला फायदा होईल काय?फायदा होत असेल तर ठीक आहे.नाहीतर या प्रथा उत्सव सोडलेल्या ब-या.एवढच ३१ डिसेंबर बद्दल सांगणं आहे
stay connected