कान्होजी जेधे म्हणजे स्वराज्य उभारण्यासाठी तीन पिढ्यांचा त्याग - प्रशांत देशमुख संजय चिखले यांच्या कादंबरीचा प्रकाशन सोहळा संपन्न

 कान्होजी जेधे म्हणजे स्वराज्य उभारण्यासाठी तीन पिढ्यांचा त्याग - प्रशांत देशमुख
संजय चिखले यांच्या कादंबरीचा प्रकाशन सोहळा संपन्न




महाड : (रवींद्र मालुसरे ) - अफजलखान स्वारीच्या वेळी बारा मावळातील देशमुखांना खानाची

कडक फर्मान गेली होती. कान्होजी जेधेंना देखील असेच एक फर्मान गेलं होतं. ते आपल्या

पाच पुत्रांना घेऊन शिवरायांच्या समोर हजर झाले. शिवरायांनी त्यांच्या निष्ठेची अनेक प्रकारे

परीक्षा पाहिली. त्या परीक्षेत कान्होजी जेधे उत्तमरीत्या पास झाले. ते स्वतः तर शिवरायांच्या

बाजूनं राहिलेच पण मावळातील देशमुखही राजांच्या बाजूने उभे केले. कर्नाटकच्या मोहिमेला

राजे जात असताना, बाजी जेधे यांचा मुलगा नागोजी जेथे युद्धात गतप्राण झाला. शिवराय

बाजींना सांगत होते की तुम्ही कारीला गावी परत जा. परंतु बाजी म्हणाले, की आज पर्यंत

जेधे घराण्यातील कोणीही मोहिमेला निघालेला असताना अर्धवट मोहीम टाकून घरी परतला

नाही, मी तुमच्या सोबतच येणार. हे बाजी म्हणजे कान्होजी जेधे यांचे एक सुपुत्र. तीन

पिढ्यांचा त्याग प्रशांत देशमुख यांनी त्यांच्या रोमहर्षक शब्दात उभा करून साक्षात प्रसंग

डोळ्यासमोर उभा केला. प्रशांत देशमुख यांनी त्यांच्या व्याख्यानात त्यांच्याकडून लिहिल्या

गेलेल्या 'जय शिवराय' या पुस्तकातील लाय पाटील आणि बाळाजी आवजी चिटणीस

यांच्यावरील प्रसंग ही उभे केले.

संजय चिखले यांनी लीहिलेल्या स्वराज्याचे पाईक कान्होजीराव नाईक जेधे या कादंबरीचा

प्रकाशन सोहळा महाडमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक बहुउद्देशीय सभागृह

येथे ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर भुस्कुटे यांचे अध्यक्षतखाली व नामवंत शिवचरित्रकार प्रशांतजी

देशमुख यांच्या शुभ हस्ते पार पडले यावेळी महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहलदीदी

माणिकराव जगताप, अशोक तलाठी, एम एम ए प्रकाशकच्या मुग्धा मसुरकर ,साहित्यिक-पत्रकार

राजेंद्रप्रसाद मसुरकर, कान्होजी जेधे वंशाचे नातेवाईक अजित देशमुख ,बंडूशेठ देशमुख , बंटीशेठ

देशमुख,राजेंद्र कोरपे ,अमित प्रभाकर मोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित पार पडले, यावेळी

महाड कोमसाप ,सुयोग नगर मित्रमंडळ , कोंझर ग्रामस्थ मंडळ,आनंद नगर ,रशिप्र शिक्षकवृंद

,मित्रपरिवार ,साहित्य प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ वि जंगम सर यांनी केले, स्नेहलदीदी जगताप,अशोक तलाठी ,बंटी

देशमुख ,प्रभाकर भुस्कुटे तसेच लेखक संजय चिखले यांनी आपले विचार मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमसाप महाडचे अध्यक्ष गंगाधर साळवी तर आभार प्रदर्शन नामदेव

डिगे सर यांनी केले









Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.