*आंबेडकर घराणं आमची अस्मिता.इतर राजकीय लोकांनी औकातीत राहून भाष्य करावे-डॉ जितीन वंजारे*
बीड प्रतिनिधी- राजकारणामध्ये राजकीय नेत्यांचा स्तर खालावत आहे,एकमेकांना रोध-प्रतिरोध करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या केल्या जातात, कटकारस्थाने केली जातात.कोणी कोणावर टीका करून प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करत आहे, तर कोणी आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही अशा पद्धतीची वल्गना करत आहे.परंतु तुमचा राजकीय दृष्टिकोन तुम्ही बाजूला ठेवा, आमच्या तमाम बहुजन समाजासाठी महामानव,विश्वरत्न, बोधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज म्हणजेच आंबेडकर घराणे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे आमची अस्मिता असून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी भाष्य करताना इतर राजकीय नेत्यांनी औकातीत राहून भाष्य करावे,नसतं आंबेडकरी समाज कोणत्याही पैसे खाऊन टीका करणाऱ्या राजकीय नेत्याला रस्त्यावर फिरू देणार नाही त्यांची जागा त्यांना दाखवून देऊ असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा कट्टर भीमसैनिक डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केला आहे.
स्वतःच्या हितासाठी हजार पक्ष बदलणाऱ्याने,दारू पिऊन कोंबडी चोरून पिठमाग्या दिडफुट्याने कोणाची तरी सुपारी घेऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका करू नये. आत्ताच काही दिवसापूर्वी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना अटक करा म्हणून एका कथित व्यक्तीने भाष्य केले.त्या व्यक्तीला माझे सांगणे आहे की त्याने अगोदर स्वतःची राजकीय पद, प्रतिष्ठा,वय,सामाजिक पोझिशन ओळखून घ्यावी कारण स्वतःच्या स्वार्थासाठी कार्यकर्त्याचा जराही विचार न करणारे भुरटे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी गरळ ओकत आहेत.काही पक्षांचे तर काही भुंकनारे कुत्रे ठेवले आहेत ते घरादारासह दुसऱ्यावर टीका टिपण्णी करत आहेत आणि त्याबदल्यात त्यांना किंचित शुक्षम् मंत्रिपद,आमदारकी आणि खासदारकी मिळत आहे अश्या सूपारीबाज राजकीय दलालांनी देशातील एकमेव स्वाभिमानी नेते आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका टिपण्णी करू नये. बाळासाहेबांना अटक करण्याचे बोल बोलून स्वतःची मी लय मोठा दलाल अशी पदवी बडवून घेऊ नये. औकतीत राहून टीका टिप्पणी करावी नसता गाठ आंबेडकरी जनतेशी आहे लक्षात ठेवा .नादी लागाल तर घराबाहेर पाडण्याचे वांदे होतील असा इशारा भीमसैनिक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीन वंजारे यांनी दिला आहे.अननपड आणि आखूड बुद्धीच्या नेत्यांनी आदरणिय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर खालच्या पातळीची टीका करून स्वतः खुप मोठा असल्याचा आव आणू नये.कोणीतरी आत्ता बेताल वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो राजगृह आणि आंबेडकर घराणं हे बहुजन समाजासाठी अनमोल असून आमच्या अस्मितेला धक्का लावण्याचा प्रयत्न येथील लायकी नसणाऱ्या कोणत्याच राजकारण्याने करू नये आणि तसा जर प्रयत्न कोणाकडून घडत असेल तर तो भीमसैनिक म्हणून आम्ही कदापिही सहन करणार नाहीत बाळासाहेब आंबेडकर यांनी ठरवलं तर एका मिनिटांमध्ये खासदारकी आमदारकी मंत्री पद किंवा इतर कोणतेही पदे ते मिळू शकतात त्यांच्यामध्ये तेवढी राजकीय उंची असून त्यांचे आजोबा महामानव विश्वरत्न बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नुसत्या नावाने आणि रक्ताचा वंशज म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना कोणतेही राजकीय पद मिळू शकते. परंतु केवळ आणि केवळ बहुजनांच्या हितासाठी शोषित पीडित मागासवर्गांसाठी सामाजिक लढा उभा करण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या रक्षणासाठी बाळासाहेब आंबेडकर रस्त्यावरची लढाई लढत आहेत. बाळासाहेब आंबेडकर हे बॅरिस्टर असून मोठे कायदे तज्ञ आहेत वयाची अनेक वर्ष त्यांनी वकीलकी व्यवसायामध्ये निपुण असे कार्य केले आहे अशा या ज्ञानवंत, कायद्याची इत्यंभूत माहिती असणाऱ्या राजकारणाची आणि राज्यकर्त्यांची व राजकीय नेत्यांची चांगलीच ओळख असणाऱ्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या स्टेटमेंट वर कोणीतरी फडतूस राजकीय उड्या मारणाऱ्यानी स्वतःची औकात 'थाळी मे बैगन' सारखी परिस्थिती असणार्या कमी उंचीच्या लोकांनी आदरणिय बाळासाहेब आबेडकर यांच्यावर जहरी टीका करू नये.सामाजिक वाद लावून राजकीय पोळी भाजून पक्षाची गुलामी आणि दलालीचे प्रदर्शन करू नये , नसता बाळासाहेबांना अटक करण्याची भाषा वापरू नये बाळासाहेब आंबेडकर हे भारत देशाचे स्वाभिमानी नेते असून बाळासाहेबांना बहुजन ह्रदय सम्राट असे म्हणले जाते. कारण गोरगरीब शोषित पीडित दलितांच्या अत्याचारासाठी अहोरात्र काम करणाऱ्या बाळासाहेब आंबेडकर यांना चॅलेंज देणाऱ्या सूक्ष्म आणि लघुंत्तम लोकांनी उंचीनुसार बोलावे त्यांनी स्वतःची राजकीय पद कितपत आहे, आपण किती पक्ष बदलले आहेत.आपली औकात बघून बोलावे.आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर माफी मागावी आणि सामाजिक वाद थांबवावा. शांततामय चाललेल्या महाराष्ट्रामध्ये थोड्याफार बोल घेवड्या लोकांमुळे शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे अशी वक्तव्य करणाऱ्या आणि जातीजातीमध्ये वाद निर्माण करणाऱ्या नेत्याला वेळीच चोप दिला पाहिजे.नसता जातीपातीमध्ये भांडण लावून सत्तेवरती बसण्याचा क्रूर कुटील डाव काही नेत्याचा फार वर्षापासून चालू आहे.भारत देशाचा एक सुजाण नागरिक म्हणून आपण हाणून पाडला पाहिजे आणि या भारतामध्ये जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांचे संविधान कोणीही मायका लाल बदलू शकत नाही. त्यामुळे संविधान रक्षक आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी इतर कोणत्याही राजकीय व्यक्तीने उठ सूट प्रसिद्धीसाठी खालच्या दर्जाची टीका टिपण्णी करू नये नसता त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा कट्टर भीमसैनिक डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी दिला आहे.
stay connected