शेतकऱ्यांनी बिगर केमिकल औषधे वापरून दर्जेदार शेतमाल तयार करावा
----आमदार सुरेश धस
**********************************
***********************************
आष्टी (प्रतिनिधी)
देशामध्ये शेतमाल पिकविण्यासाठी संशोधन मोठ्या प्रमाणावर झाले असून शेतकऱ्यांनी त्या संशोधनाचा शेती करण्यासाठी वापर करावा. आपली अर्थव्यवस्था ही शेतीवरच अवलंबून असल्याने शेतकरी सुधारला तर देश सुधारेल अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून त्या तंत्रज्ञाना आधारे शेती केल्यास नक्कीच फायदेशीर ठरू शकते तसेच शेतकऱ्यांनी बाजारात येणारी बिगर केमिकल औषधे वापरून दर्जेदार शेतमाल तयार करण्याचे आवाहन आमदार सुरेश धस यांनी केले. तसेच मी राज्यमंत्री असताना आष्टी मतदारसंघांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविला होता. त्या उपक्रमाचा आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतल्याने आता तालुका फळबागांनी भरभरून गेला आहे.
कडा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मे.आदिक वांगने लेमन ट्रेंडींग कंपनी,शेलार वाडी येथील बाबासाहेब चांगण यांच्या शिवमल्हार ट्रेंडींग कंपनी कांद्याचे व्यापारी यांचे नवीन आडतीचा आ.सुरेश अण्णा धस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
पुढे बोलताना आमदार धस म्हणाले की,कडा कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये श्रीगोंदा येथील प्रसिद्ध लिंबाचे व्यापारी आदिक शेठ वांगणे यांनी लिंबाची आमच्या विनंती वरून आडत आज सुरुवात केली आहे. ही आज अतिशय आनंदची बाब आहे की, पहिल्याच दिवशी अतिशय दर्जेदार उत्पन्न घेतलेल्या काही शेतकऱ्यांच्या मालांची आवक आज येथे पाहायला मिळाली असून या प्रकारचा दर्जा असलेल्या मालाची तालुक्यातील शेतकऱ्यांनी लिंबाचे उत्पादन घेतले तर ते लिंबू नेपाळ, दिल्ली इतर मोठ्या मोठ्या शहरात जाईल यातून चांगला भाव मिळेल असा विश्वास व्यापारी यांच्या शी चर्चा करताना दिला आहे. आपल्या तालुक्यात लिंबू उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असल्याने छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी इतरत्र व्यवसाय करण्यापेक्षा कडा बाजार समितीत येऊन व्यवसाय केला तर आम्ही त्यांना जागा व सुविधा उपलब्ध करून देऊ आम्ही त्यांना आमंत्रित करतो. छोटे मोठे लिंबू व्यापारी बाजार समितीत आले तर यातून
व्यापारात स्पर्धा वाढल्याने भावाची देखील स्पर्धा होईल यामध्ये शेतकऱ्यांचा देखील फायदा होईल असे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले.शेती व्यवसायात कधी चांदी तर कधी माती असं होत असल्याने माझा बळीराजा नेहमीच अडचणीत येत आहे.कांद्याचा निर्यातीबाबत सरकारने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे केंद्रासरकारने साखरेला ज्याप्रमाणे आधारभूत किंमत लावली आहे त्याचं प्रमाणे कांद्याला देखील लावावी अशी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री दिल्ली येथे याबाबत चर्चेला जाणार आहेत त्या अगोदर त्यांना भेटून याबाबत चर्चा करून विनंती करणार आहे.
दूध दर कमी झाल्याने याबाबत विशेष बैठक घेऊन 5 रुपये अनुदानाची आग्रही मागणी मी केली असून याबाबतचा लवकरच राज्य सरकार निर्णय घेणार आहे.
यावेळी लिंबू व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सभापती रमजान तांबोळी,उपसभापती नामदेव धोंडे, सरपंच युवराज पाटील, उपसरपंच बाळासाहेब कर्डीले,व्यापारी गोकुळ मेहेर, अनिलतात्या ढोबळे,व्यापारी आदिक शेठ वांगने,रामशेठ मधूरकर,संदीप खकाळ, संजय ढोबळे, योगेश शेठ भंडारी,बाजार समिती सचिव हनुमंत गळगटे,हेमंत पोखरणा,संजय मेहेर बबलू शेठ तांबोळी, बाबासाहेब चांगण,शिवाजी अनारसे,अशोक ढवण,उपसरपंच बाळासाहेब कर्डीले,रावसाहेब शिरसाट,संदीप नागरगोजे उपस्थित होते.
stay connected