"नवीन शैक्षणिक धोरण आणि माझी भूमिका.."
--------------------------------------------
भाव,भाषा आणि जीवन यांचा व्यवस्थित मेळ म्हणजे शिक्षण, अशी शिक्षणाची साधारण व्याख्या केली जाते.संत गाडगेबाबा नेहमी म्हणत मानवी जीवनात अज्ञान हा त्याच्या सर्व अधोगतिचा पाया आहे,मूलतः ज्ञान प्राप्त करून मिळवणारे शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे मुख्य साधन आहे.
भारत देशातील आजची शिक्षण पद्धती ही ब्रिटिश शिक्षणतज्ञ लॉर्ड मेकॉले नी तयार केलेली आहे. परंतु आज कालानरूप भारताचे नवे शैक्षनिक धोरण येऊ घातलंय, त्याचा मसुदा ही रिलीज झाला आहे आणि लवकरच तो अस्तित्वात येईल,त्यात जे आमूलाग्र बदल झाले आहेत त्यातला सर्वात मोठा बदल म्हणजे आर्टस्,कॉमर्स,सायन्स आणि प्रोफेशनल आशा ज्या वेगवेगळ्या शैक्षणिक शाखा आहेत त्या सर्व निघून जातील आणि त्या जागी इंटर डिस्प्लेनरी डिग्री येतील म्हणजे थोडक्यात काय तर या सर्व शाखेतील अभ्यासक्रम एकमेकांना पूरक,जोडलेला असेल मागील काळात डॉक्टर व इंजिनीअर होणे हे प्रथिष्टेचे समजले जाते ते ही कालांतराने आता कालबाह्य ठरत चालले आहे .नवीन शैक्षणिक धोरण व त्या द्वारे मिळणाऱ्या संधी मुळे विविध क्षेत्रात करिअर करण्याची संधी विध्यार्त्याना मिळू शकेल फक्त विध्यार्त्याने स्वतःतील क्रयशक्ती ओळखून जर योग्य क्षेत्र निवडले तर त्याचा भविष्यकाळ नक्कीच उज्वल ठरेल.
आज संपूर्ण भारतात झालेल्या एका शैक्षणिक सर्व्हे चा अहवाल जर बघितला तर शिक्षण घेऊन मिळत असलेल्या पदव्याचा 83 टक्के लोकांना ही नौकरी मिळवताना उपयोग होत नाही या फक्त कागदी डीग्र्या च ठरत आहेत. आपल्याला ही आज परदेशातील शिक्षण जसे संशोधन व प्रॅक्टिकल ज्ञानावर भर देणारे असते त्याचे कुठे तरी अनुकरण करावे लागणार आहे थेरोटीकल ज्ञानाची व्यवस्थाच कालबाह्य ठरवावी लागणार आहे.साधारण पुस्तकात असणाऱ्या ज्ञानाला आपण अभ्यासक्रम म्हणतो परंतु पाठयपुस्तक शिक्षकाने शिकवणे हा पाठयक्रम आहे पण त्यापुढे जाऊन विद्यार्थ्याला वेगवेगळे प्रात्यक्षिक अनुभव देणे हाच खरा अभ्यासक्रम आहे.
आपली शिक्षण पद्धती जरी जुनी असली तरी शिक्षक हाच त्याचा खरा गुरू आहे तोच त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो.आइन्स्टाइन च्या मते प्रत्येक विध्यार्थी हा हुशारच असतो फक्त शिक्षकाने त्यांच्यातील गुण ओळखून त्याला योग्य मार्गदर्शन केले पाहिजे त्याला योग्य ती भावी जीवनासाठीची दिशा दाखवली पाहिजे.महाभारतातील गुरू द्रोणाचार्य हे पांडवांचे गुरू होते हे पाच ही पांडव त्यांच्या या एकाच शिक्षकांकडून शिक्षण घेत होते युधिष्ठीर भालाफेक या प्रकारात निपुण होता,भीम गदा युद्धात,अर्जुन तिरंदाजीत,नकुल तलवारबाजीत तर सहदेव कुऱ्हाड चालविण्यात माहीर होता .गुरू द्रोणाचार्य ने प्राथमिक शिक्षण सर्वाना सारखेच दिले पण लक्ष दिले त्यांनी त्यांच्यातल्या कौशल्याकडे म्हणूनच पाचही पांडव आपापल्या अंगीभूत असलेल्या कौशल्यामुळे,योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे आपल्या क्षेत्रात यशस्वी ठरले. तेच कौशल्य आपल्या विद्यार्थ्यांत ओळखण्याची खरी गरज आजच्या शिक्षकांत निर्माण होणे गरजेचे आहे.
शिक्षणाचा मुख्य उद्देश हा बुद्धीचा विकास,उपजीविकेचे साधन,ज्ञानामध्ये भर व राष्ट्रनिर्मान हाच कायम राहिला पाहिजे.प्रत्येकाच्या शिक्षणाचा उपयोग राष्ट्रविकासासाठीच झाला पाहिजे त्यादृष्टीने शिक्षक म्हणून आम्ही विशेष प्रयत्न केला पाहिजे जुन्या शिक्षण व्यवस्थेतुन बोध व नवीन शिक्षण प्रणालीतून नव्या व्यवसायभिमूख शिक्षणाचा कायमच शोध घेतला पाहिजे.
इंग्लंड,चीन,जपान,फ्रान्स या देशासरखे मूल्यवर्धित व स्वावलंबी शिक्षण व्यवस्था तयार करण्याचे आव्हान आता आपण स्वीकारले पाहिजे तसेच शिक्षणाबरोबरच विध्यार्थ्यांच्या सशक्त आरोग्याची ही काळजी घेण्यासाठी शिक्षक म्हणून आपण कायम सजग राहण्याची आवश्यकता आहे कारण सुशिक्षित व आरोग्यदायी नवीन तरुण पिढी जर निर्माण झाली नाही तर कुठल्याही देशाचा सशक्त विकास होणे शक्य होणार नाही.प्रत्येक विद्यार्थी हा त्याच्या जीवनामध्ये कसा यशस्वी होईल या कडे लक्ष दिले गेले पाहिजे त्यासाठी शेतीपूरक,व्यवसायभीमुख, सर्व क्षेत्रातील ज्ञानवर्धक शिक्षण देण्याचे काम माझ्या सारख्या प्रत्येक शिक्षकाने केले पाहिजे त्यासाठी कॉर्पोरेट उद्योजक, यशस्वी शेतकरी, शास्त्रज्ञ, साहित्यिक, नीतिमूल्यांचे मार्गदर्शन करणारे तत्वज्ञ या व समाजातील विविध घटकातील अनुभवी लोकांची मदत घेऊन त्यांचे मार्गदर्शन वर्ग प्रत्येक महाविद्यालयात विध्यार्थ्यासाठी आयोजित केले गेले पाहिजेत. कायद्याचे ज्ञान ही त्याला दिले गेले पाहिजे शाखानिहाय जर विचार केला तर प्रत्येक विध्यार्थी पदवी नंतर एकाच विषयाचे ज्ञान घेऊ शकतो परंतु आज खरी गरज आहे की किमान त्याने पदवी शिक्षणात किंवा पदवी नंतर च्या शिक्षणात तरी सगळ्याच विषयाचे प्राथमिक ज्ञान त्याने प्राप्त केले पाहिजे किंबहुना तशी आजच विध्यार्थ्यांच्या मनाची तयारी करून घेणे ही शिक्षक म्हणून माझी प्राथमिक जबाबदारी आहे मानसशास्त्र हा विषय फक्त एक विषय न राहता विद्यार्त्याच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सगळ्याच शैक्षणिक शाखेत त्याचा अंतर्भाव केला गेला पाहिजे तरच विध्यार्थी मानसिक दृष्ट्या ही सक्षम होईल नाहीतर आजचा विद्यार्थी सोशल मीडिया चा तर प्रभावी वापर करत आहे पण त्याला चार माणसात उभा राहून काही बोल म्हणले तर तो विध्यार्थी बोलू शकत नाही त्यासाठी तो ज्ञाना बरोबर मनानेही खंबीर असायला पाहिजे, असलेले ज्ञान,कौशल्य त्याला व्यक्त ही करता आले पाहिजे.
प्रत्येक विद्यार्त्याने माणूस म्हणून कसे जगले पाहिजे त्याने सुसंस्कृत गुण कसे आत्मसात केले पाहिजेत यासाठी त्याला समजून घेऊन त्याच्या मानसिकतेत बदल करून ते आत्मसात करण्याची तयारी त्याच्याकडून शिक्षक म्हणून मी करून घेतली पाहिजे,चांगला शिक्षक हा फक्त त्याच्या विषयातील सखोल ज्ञानामुळे नव्हे तर त्याच्यातील कल्पकतेमुळे बनत असतो या आशयाचे एक वाक्य आहे व ते फार शिक्षकासाठी माननीय आहे.त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते परितेवाडीचे डीसले गुरुजी त्यांनी विध्यार्थ्यांना दिलेलें कल्पकतेतून आधुनिक शिक्षण व त्याद्वारे विध्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी केलेले विशेष प्रयत्न होय.
खऱ्या अर्थाने आपले मत,आपला विचार व आपलं व्यक्तिमत्व घडविण्यामध्ये आपल्या पालकांपेक्षा शिक्षकाचाच वाटा जास्त असतो असे म्हणतात की एखादा डॉक्टर,इंजिनीअर चुकला तरी चालेल पण शिक्षक चुकता कामा नये कारण तो चुकला तर सर्व समाजच चुकेल याची विशेष जाणीव ठेवून येऊ घातलेल्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार विध्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्याचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास कसा होईल यासाठी मी विशेष प्रयत्न करेल विद्यार्थ्यांत असलेल्या उपजत गुणांची त्यांना जाणीव करून देऊन त्या अनुषंगाने त्याच्या भावी जीवनासाठी काय योग्य ठरेल याचे मार्गदर्शन त्याला जाणीवपूर्वक देण्याचे माझे प्रथम कर्तव्य असेल.
शिक्षणाचा उद्देश व्यक्तिमत्व विकासासाठी जरी असला तरी आज स्पर्धा वाढली आहे शिक्षणामध्ये व्यवसायिकता निर्माण झाली आहे शिक्षण महागडे होत चालले आहे शिक्षणाचा हेतू काय तर फक्त गुणांचे मार्कशीट मिळविणे हाच दिसत आहे. एका सरकारी नौकरी च्या जागेसाठी पाच हजार अर्ज येत आहेत प्रत्येक जण स्वतःला मार्कशीट वरील मार्कवरूनच यशस्वी, अयशस्वी ठरवत आहे आयुष्याला अर्थपूर्ण बनविणे हा जरी शिक्षणाचा हेतू असला तरी खूप जणांना उत्पन्न जास्त असून ही समाधान नाही रात्री नीट झोप येत नाही परंतु उत्पन्न कमी असले तरी चालेल पण झोप चांगली आली पाहिजे,घरात आनंद असला पाहिजे.पुस्तकातील ज्ञाना बरोबरच नैतिक मूल्यांचे शिक्षण देणे ही सुद्धा शिक्षक म्हणून आजच्या नवीन शिक्षण प्रणालीत माझी प्राथमिकता असेल. जबरदस्तीने घेतलेल्या पदवी पेक्षा आपली आवड काय आहे याकडे लक्ष दिले गेले पाहिजेसमाजातील कित्येक लोकांचे उदाहरण आपण पहातोत की त्यांना त्यांच्या शिक्षणात खूप कमी गुण होते त्यांना शिकायला चांगली शाळा,कॉलेज मिळाले नाही तरी ही ते त्यांच्या आज च्या क्षेत्रात टॉपवर आहेत.विध्यार्थ्या समोर फक्त पदवी मिळवणे हा हेतू न ठेवता शिक्षक म्हणून मी त्यांना विविध विषया संदर्भात ज्ञान व नवनवीन माहिती पुरवून त्यांच्यातील ज्ञान साठा कसा वाढेल व त्या ज्ञानाचा उपयोग त्यांच्या यशस्वी भावी जीवनासाठी कसा उपयुक्त आहे हे त्याच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करेल. विध्यार्थ्यानी नवीन आधुनिक शैक्षणिक प्रणालीनुसार घेतलेले शिक्षण व मिळवलेले ज्ञान याचा उपयोग आपले कुटुंब,समाज व देशहितासाठी करावा वा त्यासाठी त्याला जाणीवपूर्वक प्रवृत्त करणे हीच माझी एक शिक्षक म्हणून कायम भूमिका असली पाहिजे तरच बदलत्या शैक्षणिक धोरणाचा उद्देश खऱ्या अर्थाने मनुष्याच्या जीवनात साध्य झाला असे म्हणता येईल.
----------------------------------------
प्रा. महेश कुंडलिक चौरे,
ऍड.बी.डी. हंबर्डे,
कनिष्ठ महाविद्यालय,आष्टी
ता.आष्टी.जि. बीड.
मो 9423471324
stay connected