खुनाचा प्रयत्न करणारे सराईत गुन्हेगार भरत उर्फ भवानी पवार व शुभम उर्फ बाबु चौधरी यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालय अहमदनगर यांनी फेटाळला - अॅड. देवा थोरवे.
अहमदनगर (प्रतिनिधी ) -
बीड जिल्हा व सत्र न्यायालयातील माजी डि.जी.पी अॅड. रमेश जंजीरे यांचा मुलगा सुशांत रमेश जंजीरे व त्यांचा कामगार संतोष खिलारे यांना दि.०२/०८/२०२३ रोजी भवानी पवार, सागर वाळके व शुभम मोकळे यांनी सय्यदमिर लोणी, ता. आष्टी येथील रेल्वे ब्रीज खाली दुपारी ४ वा. सुमारास रोडवर आडवे येवून फिर्यादीची मालवाहतुक गाडी अडवून त्यांचे जवळील असलेली पैशाची बँग हिसकावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना झटकून फिर्यादी यांनी जोरात गाडी घेवून सोलापुर हायवेने रुई छत्तीसी मार्गे हातवळण येथे जात असताना फिर्यादी वाटेफळ गावचे पुलाजवळ पोहोचले असता त्या ठिकाणी शुभम उर्फ बाबु चौधरी याने त्याची गाडी फिर्यादी यांच्या गाडीला आडवी लावली व त्या वेळी पाठीमागुन वरील तीन आरोपी सुमारे ७-८ कि.मी. फिर्यादी यांचा पाठलाग करुन त्या ठिकाणी पोहोचले. आरोपी व इतर दोघांनी त्यांचे हातातील दगड फिर्यादीचे गाडीचे ड्रायव्हर साईटचे मिररवर फेकुन मारले. फिर्यादी घाबरलेले असल्याने खाली उतरले नाही.
तेव्हा पुर्ण रोडवर ट्रॉफिक जाम झाली होती. आरोपी यांनी देखील बाजुचे दगड उचलुन फिर्यादीच्या गाडीच्या दोन्ही बाजुचे दरवाज्यावर, समोरील आरशाच्या काचा, हेडलाईट फोडून टाकले व आरोपीने फिर्यादीस गाडीचे बाहेर ओढले. तसेच कामगार याला सागर वाळके याने गाडीचे डाव्या बाजुच्या दरवाज्यातुन खाली ओढून मारहाण करण्यास सुरुवात केली व रोडच्या कडेला पडलेला दगड उचलुन फिर्यादीस मारहाण केली. आरोपी भरत उर्फ भवानी पवार याने त्याच्या हातातील लोखंडी रॉड हा संतोष खिलारे हा समजावुन सांगत असताना देखील त्याचे तोंडावर मारला. त्यामुळे त्याचे चार दात पडले. तेव्हा बाबु चौधरी याने त्याच्या कमरेचा चाकु काढून फिर्यादीचे पोटात भोकसण्याच्या उद्देशाने मारला. परंतु फिर्यादी घाबरुन पाठ फिरवल्याने तो चाकु फिर्यादीचे डावे पार्श्वभागामध्ये घुसला व त्याने तो चाकु पुन्हा उपसला. तेव्हा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होवून फिर्यादीची पॅन्ट रक्ताने माखली व टिर्शला देखील रक्त लागले. तेवढयात फिर्यादीचा चुलत भाऊ मुकुंद व वडील रमेश जंजीरे हे फिर्यादीस वाचविण्याकरीता त्या ठिकाणी आले. वरील लोक फिर्यादीला मारहाण करत असताना फिर्यादीचा चुलत भाऊ मुकुंद हा मध्ये आला असता त्याला देखील बाबु चौधरी याने त्याचे हातातील चाकु पोटात भोकसण्याच्या उद्देशाने मारला असता तो त्याचे पोटाचे खाली डावे बाजुला खुपासला आहे. तेव्हा त्याचे देखील रक्त निघु लगल्याने तो देखील वरील चौघांना हात जोडून आम्हाला मारहाण का करता असे म्हणून गयावया करु लागला. तेव्हा फिर्यादीचे वडील त्यांना वाचवण्याकरीता मध्ये आले असता आरोपी व सागर वाळके यांनी दगडे फेकुन मारले. त्यात फिर्यादीचे वडील यांना डावे हाताचे कोपऱ्याच्या खाली जखम होवून हात सुजला आहे. तेव्हा त्या ठिकाणी मोठ्या स्वरुपात ट्रॅफिक जाम झाल्याने शुभम मोकळे व सागर वाळके यांनी फिर्यादीचे गाडीतुन पैशाची बॅग काढून घेतली व पळुन गेले. जाताना गाडीचे समोरील बाजुने मोठ मोठे दगडे मारुन गाडीचे नुकसान केले. त्यानंतर फिर्यादी व जखमींना पुढील उपचारासाठी सिव्हील हॉस्पीटल अहमदनगर येथे दाखल केले.
फिर्यादींचे जबाबानुसार नगर तालुका पोलीस स्टेशन मार्फत भवानी पवार, सागर वाळके व शुभम मोकळे व इतर यांचे विरुध्द भा. द. वि. कलम ३०७, ३२७, ३२५, ३४१, ३३६, ३२४, ३२३, ५०४, ४२७ सह ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सदर आरोपी शुभम उर्फ बाबु चौधरी यांनी मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश साहेब यांचे समोर अटकपूर्व जामीन अर्ज नं.१४८२/२०२३ दाखल केला. सदरचा जामीन मे. न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर आरोपी शुभम बाबु चौधरी व भरत उर्फ भवानी पवार यांना पोलीसांनी अटक करुन मे. न्यायालयात हजर केले. त्यानंतर सदर दोन्ही आरोपींनी अहमदनगर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश यांचे समोर रेग्युलर जामीन अर्ज नं.१७६७/२०२३ व रेग्युलर जामीन अर्ज नं.१९११/२०२३ दाखल केला, त्यावेळी मुळ फिर्यादी यांचे वकील यांनी काही उच्च न्यायालयातील न्यायनिर्णयांचा संदर्भ देत जामीन अर्जास विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर दोनही आरोपींचा रेग्युलर जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सदर अर्जामध्ये मुळ फिर्यादी यांचेवतीने अॅड. देवा थोरवे यांनी बाजू मांडली.
stay connected