संजय गांधी, श्रावणबाळ योजनेचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढावे नसता उपोषण..रविकाका ढोबळे

 संजय गांधी, श्रावणबाळ योजनेचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढावे नसता उपोषण..रविकाका ढोबळे

---------------------------------------



आष्टी/ प्रतिनिधी

गेली अनेक दिवसांपासून संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ वृध्दापकाळ योजनेची प्रलंबित प्रकरणे निकाली काढावे नसता येत्या ३०  डिसेंबर रोजी तहसिल कार्यालयासमोर उग्र स्वरुपाचे उपोषण करण्यात येईल असा इशाराही तालुकाध्यक्ष रविकाका ढोबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.


आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात संजय गांधी, श्रावणबाळ योजनेचे अनेक लाभार्थी आहेत.

परंतु सध्या वाढत्या महागाईचा विचार करता दिड हजार रुपये त्या लाभार्थ्यांना कमी पडत आहेत त्यामुळे कमीत कमी प्रत्येक महीन्याकाठी तीन हजार रुपये अनुदान मिळालेच पाहिजे ही सुद्धा प्रमुख मागणी आहे.

या मागणीची गांभीर्याने दखल घ्यावी नसता ३० डिसेंबर रोजी उपोषण करणार असा इशाराही रविकाका ढोबळे यांनी  निवेदनाद्वारे दिला आहे.

या निवेदनावर काकासाहेब कर्डिले, आदिनाथ महाडीक, दादासाहेब कटके सह राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.